अ‍ॅपशहर

कराचीही अखंड भारतात सामील होणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Devendra Fadnavis on Akhand Bharat : पाकिस्तान आणि बांग्लादेशसहीत'अखंड भारत' या भाजप आणि आरएसएसच्या भविष्यातील संकल्पनेवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विश्वास व्यक्त केलाय. दुसरीकडे, 'लव्ह जिहाद'विरोधात कायद्याचंही त्यांनी समर्थन केलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2020, 1:56 pm
नवी दिल्ली : भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला 'अखंड भारत' या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. 'आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल' असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईतील एका 'कराची स्वीटस्' नामक दुकानावरून शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)


'कराची' नावाचा वाद

'कराची स्वीटस्'च्या नावाला विरोध करत कराची बेकरीचे नाव बदला किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली. मात्र, ही पक्षाची अधिकृत भूमिका नसून नांदगावकर यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.


'कराची बेकरी आणि कराची स्वीट्स ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी संबध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही', असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.

मात्र, शिवसेनेच्या धास्तीनं कराची स्वीटसच्या मालकांनी आपल्या दुकानाच्या नावावर वर्तमानपत्र चिटकवत तात्पुरता हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय.

वाचा : नितीन नांदगावकर यांची कराची बेकरीचे नाव बदलण्याची मागणी; संजय राऊत म्हणाले...
वाचा : शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांला सत्य कधी कळणार?; काँग्रेस नेत्याचा टोला


भाजप नेत्यांची 'अखंड भारता'बद्दलची वादग्रस्त विधानं

अखंड भारताबद्दल वादग्रस्त विधान करणारे देवेंद्र फडणवीस हे काही भाजपचे पहिलेच नेते नाहीत. या अगोदर अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संघाच्या मुशीत वाढलेल्या भाजप नेत्यांनी अशी विधानं केलेली आहेत.

'आरएसएसच्या म्हणण्यानुसार, एक दिवस भारत, पाकिस्तान आणि अवघ्या काही दशकांपूर्वी विलग झालेले बांग्लादेश हे भाग पुन्हा एकत्र येणार आणि अखंड भारताची निर्मिती होईल' असं विधान या अगोदर राम माधव यांनी 'अल जजीरा'शी बोलताना केलं होतं.

मार्च २०१९ रोजी इंद्रेश कुमार यांनी, 'भारत आणि पाकिस्तान २०२५ पर्यंत एक होतील आणि भारतीय पुन्हा लाहौरमध्ये वसतील' असं वक्तव्य केलं होतं.

तर माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनीदेखील 'युरोपियन युनियन'च्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान एकत्र येईल, अशी आशा व्यक्त केली होती.

देवेंद्र फडणवीस संघाच्या स्टेजवर (फाईल फोटो)


'लव्ह जिहाद'विरोधात कायदा


अखंड भारताविषयी विश्वास व्यक्त करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. 'देशात लव्ह जिहाद हे सत्य आहे. केरळमधून अशी प्रकरणं समोर आली आहेत, जिथे भाजपचं सरकार नाही. ही आता त्या सरकारांची जबाबदारी आहे की अशा प्रकरणांत त्यांनी कायदा आणावा', असही फडणवीस यांनी म्हटलंय.

वाचा : 'धार्मिक कट्टरता-आक्रमक राष्ट्रवाद करोनापेक्षाही गंभीर आजार'
वाचा :
'देशाला विभागण्यासाठी भाजपकडून लव्ह जिहाद शब्दाची निर्मिती'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज