वसूधा वेणुगोपाल, नवी दिल्ली
एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूचे गुढ हा सध्या तामिळनाडूतील चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्या मृत्यूबाबतच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलेले असतानाच जयललिता यांच्या निधनाच्या एक दिवसाआधीच त्यांच्या शवपेटीची ऑर्डर देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जयललिता यांना रविवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर तातडीचे उपचार करत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. परंतू त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच एआयएडीएमकेच्या नेत्यांनी रविवारीच त्यांच्या अंतिमसंस्काराची तयारी सुरु केली होती, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
ज्या शवपेटीत जयललिता यांना मंगळवारी दफन करण्यात आले होते, त्या शवपेटीची एआयएडीएमकेने रविवारीच ऑर्डर दिली होती. एवढेच नव्हे तर ज्या राजाजी हॉलमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते, तो हॉलही स्वच्छ करण्याचे आदेश एक दिवसआधीच देण्यात आले होते, अशी माहिती सरकारी सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. जयललिता यांच्या निधनाची अधिकृत घोषणा होण्याआधीच पक्ष कार्यालयावरचा ध्वजही अर्ध्यावर आण्ण्यात आला होता. त्यामुळे जयललिता यांचे निधन रविवारीच झाले होते काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
रविवारी संध्याकाळी ७ वाजता तामिळनाडूचे चार मंत्री ओ.पनीरसेल्वम, डी.जयकुमार, पी.बेंजामिन आणि के.पंड्याराजन यांना जयललिता यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले होते. हे चारही मंत्री त्यावेळी रुग्णालयात उपस्थित होते. बाकी मंत्र्यांना नंतर ही माहिती देण्यात आली. जयललिता यांना डिवाइसवर ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्या काहीकाळ जिवंत राहू शकल्या, अशी माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.
एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूचे गुढ हा सध्या तामिळनाडूतील चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्या मृत्यूबाबतच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलेले असतानाच जयललिता यांच्या निधनाच्या एक दिवसाआधीच त्यांच्या शवपेटीची ऑर्डर देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जयललिता यांना रविवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर तातडीचे उपचार करत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. परंतू त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच एआयएडीएमकेच्या नेत्यांनी रविवारीच त्यांच्या अंतिमसंस्काराची तयारी सुरु केली होती, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
ज्या शवपेटीत जयललिता यांना मंगळवारी दफन करण्यात आले होते, त्या शवपेटीची एआयएडीएमकेने रविवारीच ऑर्डर दिली होती. एवढेच नव्हे तर ज्या राजाजी हॉलमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते, तो हॉलही स्वच्छ करण्याचे आदेश एक दिवसआधीच देण्यात आले होते, अशी माहिती सरकारी सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. जयललिता यांच्या निधनाची अधिकृत घोषणा होण्याआधीच पक्ष कार्यालयावरचा ध्वजही अर्ध्यावर आण्ण्यात आला होता. त्यामुळे जयललिता यांचे निधन रविवारीच झाले होते काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
रविवारी संध्याकाळी ७ वाजता तामिळनाडूचे चार मंत्री ओ.पनीरसेल्वम, डी.जयकुमार, पी.बेंजामिन आणि के.पंड्याराजन यांना जयललिता यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले होते. हे चारही मंत्री त्यावेळी रुग्णालयात उपस्थित होते. बाकी मंत्र्यांना नंतर ही माहिती देण्यात आली. जयललिता यांना डिवाइसवर ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्या काहीकाळ जिवंत राहू शकल्या, अशी माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.