वृत्तसंस्था, चेन्नई
अडचणीत सापडलेले अण्णा द्रमुकचे (अम्मा) नेते टीटीव्ही दिनाकरन यांनी आपली भूमिका सौम्य केली असून, प्रतिस्पर्धी पक्षात आपल्या पक्षाचे विलीनीकरण करण्यास आपली काहीच आडकाठी नसल्याचे यांनी स्पष्ट केले. आपल्याविरोधात झालेली बंडखोरी ही भीतीतून झाल्याचा दावाही त्यांनी केला.
पक्षाच्या भल्यासाठी आपण पायउतार झाल्याचे स्पष्ट करून, आमदारांची बोलावलेली बैठक हे कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन नसल्याचे दिनकरन यांनी सांगितले. ‘सर्व आमदारांना बोलावले आहे. मी कोणत्याही प्रकारे संख्याबळ दाखवायचा प्रयत्न करत नाही,’ असे त्यांनी नमूद केले. ‘त्यांनी कुठल्या तरी भीतीतून बंड केले असावे. कदाचित माझ्याविरोधात काही असमाधान असेल, मला माहीत नाही; पण माझ्या विरोधात झालेल्या बंडाबाबत मला अजिबात खेद वाटत नाही. त्यांच्या कृतीमुळे पक्षावर आणि सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही,’ असेही ते म्हणाले.
अडचणीत सापडलेले अण्णा द्रमुकचे (अम्मा) नेते टीटीव्ही दिनाकरन यांनी आपली भूमिका सौम्य केली असून, प्रतिस्पर्धी पक्षात आपल्या पक्षाचे विलीनीकरण करण्यास आपली काहीच आडकाठी नसल्याचे यांनी स्पष्ट केले. आपल्याविरोधात झालेली बंडखोरी ही भीतीतून झाल्याचा दावाही त्यांनी केला.
पक्षाच्या भल्यासाठी आपण पायउतार झाल्याचे स्पष्ट करून, आमदारांची बोलावलेली बैठक हे कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन नसल्याचे दिनकरन यांनी सांगितले. ‘सर्व आमदारांना बोलावले आहे. मी कोणत्याही प्रकारे संख्याबळ दाखवायचा प्रयत्न करत नाही,’ असे त्यांनी नमूद केले. ‘त्यांनी कुठल्या तरी भीतीतून बंड केले असावे. कदाचित माझ्याविरोधात काही असमाधान असेल, मला माहीत नाही; पण माझ्या विरोधात झालेल्या बंडाबाबत मला अजिबात खेद वाटत नाही. त्यांच्या कृतीमुळे पक्षावर आणि सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही,’ असेही ते म्हणाले.