नवी दिल्ली : भारतातील शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या एका अहवालावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला केलाय. 'काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा' असं म्हणत या पदाची जबाबदारी नाकारणारे काँग्रेसचे वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी मात्र करोना संक्रमणानंतर मोदी सरकारवर टीकेचं सातत्य राखलंय.
'मी गेल्या कित्येक महिन्यांपासून देत असलेल्या इशाऱ्यांना आरबीआयनं आता दुजोरा दिलाय' असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. 'सरकारनं अधिक खर्च करावा, अधिक उधार देऊ नये. गरीबांना पैसे द्यावेत, उद्योपतींना करात कपात नाही... अर्थव्यवस्थेला उपभोगासोबत पुन्हा: रुळावर आणावं' असा सल्लाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे.
वाचा : काँग्रेस अध्यक्ष सोनियांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर
वाचा : PM केअर्स फंडसंदर्भात मागितली माहिती, PMO ने दिले 'हे' उत्तर
'मीडियाच्या माध्यमातून लक्ष दुसरीकडे वळवण्यानं गरीबांना मदत मिळणार नाही किंवा आर्थिक संकट आपोआप गायबही होणार नाही' अशी बोचरी टीकाही त्यांनी सरकारवर केलीय.
सत्ताधारी पक्षानं मात्र विरोधकांचे सगळेच दावे फेटाळून लावलेत. गेल्याच आठवड्यात भाजप प्रमुख जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांना 'अपात्र राजकुमार' तसंच 'पराभूत व्यक्ती' म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी पीएम केअर बद्दल चुकीच्या बातम्या फैलावत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी आरबीआयकडून सप्टेंबर महिन्यापर्यंत आर्थिक आकुंचनाचा इशारा देण्यात आला होता. 'करोना व्हायरसचा अधिक फैलाव, कोणत्याही पूर्वानुमानाशिवाय अचानक जोरदार पाऊस आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारात चढ-उतार हे विकासाचे मुख्य धोके आहेत' असं या अहवालात म्हटलं गेलंय.
वाचा : सोनिया गांधींना पत्र; अखेर आनंद शर्मांनी तोडली चुप्पी, म्हणाले...
वाचा : राहुल गांधी यांचा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...