नवी दिल्ली : दिल्लीमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून राजकीय नेते मतदारांना मते देण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी जंग जंग पछाडत असतानाच, 'न्यायाचे आश्वासनच या केवळ राजकीय क्लृप्त्या ठरत असून यंत्रणेकडून आपला भ्रमनिरास झाला आहे,' असे सांगून या वेळी लोकसभेच्या निवडणुकीत कदाचित मतदान करणार नाही, अशी हताशा 'निर्भया'चे पालक आशादेवी आणि बद्रीनाथ सिंह यांनी व्यक्त केली. 'निर्भया' सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणात धैर्याचे प्रतीक ठरलेल्या या जोडप्याने निराशा व्यक्त केली.
'यंदा मतदान करणार नाही'
दिल्लीमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून राजकीय नेते मतदारांना मते देण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी जंग जंग पछाडत असतानाच, 'न्यायाचे आश्वासनच या ...
MT 26 Apr 2019, 4:00 am