कानपूर/मुंबई: कुख्यात डॉ. बॉम्ब म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. जलीस अन्सारीला शुक्रवारी कानपुरमधून अटक करण्यात आली. पॅरोलवर सुटल्यानंतर अन्सारी फरार झाला. पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. एका पाच वर्षाच्या मुलाच्या मदतीने लखनऊला जाण्यासाठी कानपूर स्टेशन गाठले असल्याची माहिती त्याने दिली.
अन्सारीने फरार होण्यामागील दिलेले कारणही पोलिसांना चक्रावून सोडणारे आहे. जवळपास २६ वर्षानंतर पॅरोलवरून सुटका झाल्यानंतर अन्सारी घरी गेला. त्यानंतर त्याचे पत्नी आणि मुलांसोबत भांडण होत होती. या भांडणाला अन्सारी वैतागला होता. आग्रीपाडामधील घरातून सकाळीच घर सोडले. घराबाहेरून त्याने टॅक्सी पकडली आणि भायखळा स्थानक गाठले. भायखळा स्थानकातून लोकल पकडून त्याने कल्याण गाठले. सकाळी ९.३०च्या आसपास त्याने पुष्पक एक्स्प्रेसने कानपूर गाठले. कानपूरमधील फेथफुलगंजमध्ये असणाऱ्या उंच मशिदीत त्याने आसरा घेतला. एका स्थानिकाच्या मदतीने त्याने कानपूर स्थानक गाठले. या वेळी अन्सारीसोबत एक पाच वर्षाचा मुलगा होता. त्याचे बोट पकडून स्थानकाच्या दिशेने चालू लागला. या लहान मुलाचे वडिलही त्याच्यासोबत होते. कानपूर स्थानक आल्यानंतर त्याने लहान मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडले. लखनऊला जाणाऱ्या ट्रेनची चौकशी करत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
का म्हटलं जातं अन्सारीला डॉ. बॉम्ब?...वाचा
मुंबईतून पसार 'डॉ. बॉम्ब'ला कानपुरात बेड्या
अन्सारी मुंबईतून फरार झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क करण्यात आलं होतं. अन्सारी मूळ मुंबईचा आहे. त्याला राजस्थानमधील अजमेर सेंट्रल जेलने २१ दिवसांच्या पॅरोलवर सोडलं होतं. तो शुक्रवारी सरेंडर करणार होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की पॅरोलदरम्यान अन्सारी रोज सकाळी १०.३० ते १२ च्या दरम्यान, मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावायचा. गुरुवारी तो आला नाही. दुपारी अन्सारीचा ३५ वर्षीय मुलगा जेद अन्सारी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. घरी नमाज अदा करायला जातो सांगून अन्सारी गायब झाला होता.
अन्सारीने फरार होण्यामागील दिलेले कारणही पोलिसांना चक्रावून सोडणारे आहे. जवळपास २६ वर्षानंतर पॅरोलवरून सुटका झाल्यानंतर अन्सारी घरी गेला. त्यानंतर त्याचे पत्नी आणि मुलांसोबत भांडण होत होती. या भांडणाला अन्सारी वैतागला होता. आग्रीपाडामधील घरातून सकाळीच घर सोडले. घराबाहेरून त्याने टॅक्सी पकडली आणि भायखळा स्थानक गाठले. भायखळा स्थानकातून लोकल पकडून त्याने कल्याण गाठले. सकाळी ९.३०च्या आसपास त्याने पुष्पक एक्स्प्रेसने कानपूर गाठले. कानपूरमधील फेथफुलगंजमध्ये असणाऱ्या उंच मशिदीत त्याने आसरा घेतला. एका स्थानिकाच्या मदतीने त्याने कानपूर स्थानक गाठले. या वेळी अन्सारीसोबत एक पाच वर्षाचा मुलगा होता. त्याचे बोट पकडून स्थानकाच्या दिशेने चालू लागला. या लहान मुलाचे वडिलही त्याच्यासोबत होते. कानपूर स्थानक आल्यानंतर त्याने लहान मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडले. लखनऊला जाणाऱ्या ट्रेनची चौकशी करत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
का म्हटलं जातं अन्सारीला डॉ. बॉम्ब?...वाचा
मुंबईतून पसार 'डॉ. बॉम्ब'ला कानपुरात बेड्या
अन्सारी मुंबईतून फरार झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क करण्यात आलं होतं. अन्सारी मूळ मुंबईचा आहे. त्याला राजस्थानमधील अजमेर सेंट्रल जेलने २१ दिवसांच्या पॅरोलवर सोडलं होतं. तो शुक्रवारी सरेंडर करणार होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की पॅरोलदरम्यान अन्सारी रोज सकाळी १०.३० ते १२ च्या दरम्यान, मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावायचा. गुरुवारी तो आला नाही. दुपारी अन्सारीचा ३५ वर्षीय मुलगा जेद अन्सारी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. घरी नमाज अदा करायला जातो सांगून अन्सारी गायब झाला होता.