अ‍ॅपशहर

पाकिस्तानमार्गे उड्डाणे नकोत

भारतीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणे करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने भारतातून आखाती देशात जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलावेत अशी मागणी करणारे पत्रच विमान कंपन्यांनी सरकारला पाठवले आहे. भारत-पाकमधील तणावपूर्ण संबंधांमुळे सुरक्षेचा प्रश्न आणि येणारा खर्च या दोन मुख्य कारणांमुळे ही मागणी विमान कंपन्यांनी केल्याचे समजते.

Maharashtra Times 23 Aug 2016, 7:20 pm
सौरभ सिन्हा । टाइम्स न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dont want to fly over pakistan airlines write to modi government for help
पाकिस्तानमार्गे उड्डाणे नकोत


भारतीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणे करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने भारतातून आखाती देशात जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलावेत अशी मागणी करणारे पत्रच विमान कंपन्यांनी सरकारला पाठवले आहे. भारत-पाकमधील तणावपूर्ण संबंधांमुळे सुरक्षेचा प्रश्न आणि येणारा खर्च या दोन मुख्य कारणांमुळे ही मागणी विमान कंपन्यांनी केल्याचे समजते.

आम्हाला पश्चिम भारत (मुख्यत: अहमदाबाद) मार्गे उड्डाण करण्याची परवानगी देऊन अरबी समुद्रावरून आखाती देशांमध्ये उड्डाणे करण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, याबाबत विमान कंपन्या आग्रही आहेत. सरकारने ही परवानगी दिल्यास भारतीय कंपन्यांच्या विमानांना पाकिस्तानच्या एअर स्पेसचा वापर करावा लागणार नाही, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. सध्या आखाती देशात जाण्यासाठी जे मार्ग आहेत ते पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून आहेत, तसेच या मार्गाने जातानाही खूप फिरून जावं लागत असल्याने कंपन्यांना खर्च जास्त होतो, याकडे कंपन्यांनी लक्ष वेधलंय.

भारत-पाकिस्तानच्या बिघडणाऱ्या संबंधामुळे हवेत असणाऱ्या विमानाच्या सुरक्षिततेबद्दलही कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट आणि जेट एअरवेज या कंपन्यांची विमाने पाकिस्तान एअर स्पेसचा वापर करून आखाती देशांमध्ये प्रवास करतात. मागील काही दिवसांमध्ये बलुचिस्तानवरून राजकारण तापल्यानंतर, भारताने पाकच्या ऐनवेळी मार्ग बदलाव्या लागलेल्या विमानांना आपल्या एअर स्पेसचा वापर करण्यास बंदी घालत परत जाण्यास सांगितले होते. त्यामुळे पाकिस्तानही सूड घेण्याच्या उद्देशाने अशीच कारवाई करू शकतो, अशी भीतीही कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

स्पाइसजेटने आपल्या विमानांना अहमदाबादवरुन सरळ आखाती देशांमध्ये उड्डाण करण्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. हवाई दल आणि नौदलाकडून वापरण्यात येणाऱ्या मार्गाचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असं कंपनीचं म्हणणं आहे. संबंधित मार्गावरून प्रवास करताना ही उड्डाणे काही अतिसंवेदशशील प्रदेशातून असतील. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. मात्र अनेक कंपन्यांकडून अशा प्रकारची मागणी होत असल्याने मंत्रालय याबद्दल विचार करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज