अ‍ॅपशहर

मदतीअभावी आक्रोश

पश्चिम बंगालमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वाढत चाललेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असले, तरी प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करीत नागरिक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रोश करीत आहेत.

Maharashtra Times 20 Aug 2017, 2:09 am
कोलकाता ः पश्चिम बंगालमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वाढत चाललेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असले, तरी प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करीत नागरिक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रोश करीत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम due to floods in west bengal life becomes disrupted
मदतीअभावी आक्रोश


पश्चिम बंगालमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उत्तर बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस पाणीपातळी वाढत आहे. फूलहार आणि महानंदा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राष्ट्रीय महामार्ग ३४ काही प्रमाणात सुरू असले तरी राष्ट्रीय महामार्ग ८१ पूर्णपणे बंद आहे. रस्ते आणि रेल्वेसेवा कोलमडल्याने दिनाजपूर आणि मालदामध्ये आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे, सरकारी यंत्रणेकडून पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याचा आरोप करीत नागरिक राग व्यक्त करीत आहेत. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार विनंत्या करूनही कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी दक्षिण दिनाजपूरमधील पंचायत समितीच्या सदस्यांना मारहाण केली. तसेच, श्रीपूर येथील सरकारी गोडावूनही लूटण्यात आले. रतुआमधील पूरग्रस्त नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात रोष व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, ‘तृणमूल काँग्रेस सरकारकडून स्वयंसेवी संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही स्वयंसेवी संस्थांशी बैठक घेऊन पूरग्रस्तांना अन्न पुरविण्याची विनंती करीत आहोत,’ असे इंग्ल‌िश बझार महानगरपालिकेचे अध्यक्ष निहार रंजन घोष यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज