अ‍ॅपशहर

उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; पाकिस्तानात १९ जणांचा मृत्यू, ३०० जखमी

दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. पाकिस्तानला भूकंपाचे सर्वाधिक फटके बसले असून त्यात १९ लोक ठार झाले असून ३०० लोक जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2019, 10:12 pm
नवी दिल्लीः दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. पाकिस्तानला भूकंपाचे सर्वाधिक फटके बसले असून त्यात १९ लोक ठार झाले असून ३०० लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे पाकिस्तानच्या रस्त्यांवर भेगा पडल्या असून भूकंपामुळे अनेक वाहने उलटल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम earthquake


आज दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहे. मीरपूर जवळील पीओकेच्या जाटलान परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. पीओकेत भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भूकंपात ५ जणांचा मृत्यू आणि ५० लोक जखमी झाले आहेत.भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी असून हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

पालघरमध्ये ४.३ तीव्रतेचा भूकंप; गुजरातच्या सीमेपर्यंत हादरे

उत्तर भारतातील अनेक राज्यात आज दुपारी भूकंपाचे धक्के बसले. जम्मू काश्मीरलगत भारत-पाकिस्तान सीमेजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यात हे धक्के जाणवले आहेत. तसेच दिल्लीसह अन्य राज्यातही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. मीरपूर जवळील पीओकेच्या जाटलान परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. पीओकेत भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भूकंपात १९ जणांचा मृत्यू आणि ३०० लोक जखमी झाले आहेत. रस्त्यांना तडे गेले असून रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या उलटल्या आहेत. भूकंपामुळे जम्मू-काश्मीरमध्ये फारसे नुकसान झाले नाही, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज