नवी दिल्ली : अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने पंजाब आणि हरयाणामध्ये छापे टाकले आहेत. पंजाबमधील मोहाली आणि लुधियाना येथे तपास सुरू आहे. त्याचवेळी हरयाणातील पंचकुलामध्ये छापा टाकण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहालीमध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी यांच्या जवळच्या नातेवाईकांवर छापा टाकण्यात आला आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राज्यात जवळपास १२ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.
प्राथमिक माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी २०१८ मध्ये अवैध वाळू उत्खननाबाबत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण नंतर ईडीने ताब्यात घेतले होते. या प्रकरणात भूपिंदर नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. जो पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. ज्या व्यक्तीवर छापा टाकण्यात आला तो सीएम चन्नी यांच्या मेहुणीचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र, मुख्यमंत्री चन्नी यांच्या नावाखाली अवैध वाळू उत्खननाचे काम केले आहे का? याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
PM Modi Security Breach मोदींच्या सुरक्षेत चूक: खलिस्तान्यांची इंदू मल्होत्रांना धमकी; 'चौकशी कराल तर...'
म्हणून केंद्राची कारवाई?
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत मोठी चूक झाली होती. पंतप्रधान मोदींना आंदोलकांनी एका उड्डाण पुलावर रोखले होते. यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपने मोठी नाराजी व्यक्त केली आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या स्वतंत्र समितीकडून चौकशी सुरू आहे. पण पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्गीपणामुळे केंद्र सरकारने ईडीची कारवाई केल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे.
Delhi IED Case: दिल्लीत दहशतवाद्यांनी प्लांट केला होता बॉम्ब!; 'या' पत्रामुळे उडाली खळबळ
प्राथमिक माहितीनुसार, पंजाब पोलिसांनी २०१८ मध्ये अवैध वाळू उत्खननाबाबत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण नंतर ईडीने ताब्यात घेतले होते. या प्रकरणात भूपिंदर नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. जो पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. ज्या व्यक्तीवर छापा टाकण्यात आला तो सीएम चन्नी यांच्या मेहुणीचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र, मुख्यमंत्री चन्नी यांच्या नावाखाली अवैध वाळू उत्खननाचे काम केले आहे का? याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
PM Modi Security Breach मोदींच्या सुरक्षेत चूक: खलिस्तान्यांची इंदू मल्होत्रांना धमकी; 'चौकशी कराल तर...'
म्हणून केंद्राची कारवाई?
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत मोठी चूक झाली होती. पंतप्रधान मोदींना आंदोलकांनी एका उड्डाण पुलावर रोखले होते. यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपने मोठी नाराजी व्यक्त केली आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या स्वतंत्र समितीकडून चौकशी सुरू आहे. पण पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्गीपणामुळे केंद्र सरकारने ईडीची कारवाई केल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे.
Delhi IED Case: दिल्लीत दहशतवाद्यांनी प्लांट केला होता बॉम्ब!; 'या' पत्रामुळे उडाली खळबळ