मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अखेर विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार ११ जानेवारी ते ८ मार्च अशी जवळपास दोन महिने निवडणूक प्रक्रिया चालणार असून ११ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व राज्यांचा निकाल हाती येणार आहे. या पाचही राज्यांमध्ये आजपासूनच तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पाच राज्यांमध्ये ६९० जागासांठी ही रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीत एकूण १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १ कोटी ८५ लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संख्या २०१२च्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. निवडणूक प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मतदार यादीत सुधारणा करून रंगीत मतदार गाइड दिलं जाणार आहे. त्यात निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आलं असून नव्या मतदारांनाही ओळखपत्रं वितरीत करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिव्यांगांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल याची काळजी घेण्यात येईल तसेच महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येईल, असेही झैदी यांनी नमूद केले.
११ जानेवारी ते ११ मार्च
पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून ११ जानेवारी ते ११ मार्च अशी दोन महिने निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. गोवा आणि पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंडमधील सर्व ६० जागांसाठी १५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ३८ जागांसाठी ४ मार्च तर दुसऱ्या टप्प्यात २२ जागांसाठी ८ मार्चला मतदान होईल. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ फेब्रुवारी रोजी ७३ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारी रोजी ६७ जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १९ फेब्रुवारी रोजी ६९ जागांसाठी, चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी रोजी ५३ जागांसाठी, पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारी रोजी ५२ जागांसाठी, सहाव्या टप्प्यात ४ मार्च रोजी ४९ जागांसाठी तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी ४० जागांसाठी मतदान होईल. या पाचही राज्यांमध्ये रविवार, ११ मार्च रोजी एकाचदिवशी मतमोजणी होणार आहे.
राज्यनिहाय जागा
उत्तर प्रदेश - ४०३
उत्तराखंड - ७०
पंजाब - ११७
गोवा - ४०
मणिपूर - ६०
एकूण जागा - ६९०
राखीव जागा-
अनुसूचित जाती - १३३
अनुसूचित जमाती - २३
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अखेर विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार ११ जानेवारी ते ८ मार्च अशी जवळपास दोन महिने निवडणूक प्रक्रिया चालणार असून ११ मार्च रोजी एकाच दिवशी सर्व राज्यांचा निकाल हाती येणार आहे. या पाचही राज्यांमध्ये आजपासूनच तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पाच राज्यांमध्ये ६९० जागासांठी ही रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीत एकूण १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १ कोटी ८५ लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संख्या २०१२च्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. निवडणूक प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मतदार यादीत सुधारणा करून रंगीत मतदार गाइड दिलं जाणार आहे. त्यात निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आलं असून नव्या मतदारांनाही ओळखपत्रं वितरीत करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिव्यांगांसाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल याची काळजी घेण्यात येईल तसेच महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येईल, असेही झैदी यांनी नमूद केले.
११ जानेवारी ते ११ मार्च
पाचही राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून ११ जानेवारी ते ११ मार्च अशी दोन महिने निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. गोवा आणि पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंडमधील सर्व ६० जागांसाठी १५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ३८ जागांसाठी ४ मार्च तर दुसऱ्या टप्प्यात २२ जागांसाठी ८ मार्चला मतदान होईल. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ फेब्रुवारी रोजी ७३ जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारी रोजी ६७ जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १९ फेब्रुवारी रोजी ६९ जागांसाठी, चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी रोजी ५३ जागांसाठी, पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारी रोजी ५२ जागांसाठी, सहाव्या टप्प्यात ४ मार्च रोजी ४९ जागांसाठी तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी ४० जागांसाठी मतदान होईल. या पाचही राज्यांमध्ये रविवार, ११ मार्च रोजी एकाचदिवशी मतमोजणी होणार आहे.
राज्यनिहाय जागा
उत्तर प्रदेश - ४०३
उत्तराखंड - ७०
पंजाब - ११७
गोवा - ४०
मणिपूर - ६०
एकूण जागा - ६९०
राखीव जागा-
अनुसूचित जाती - १३३
अनुसूचित जमाती - २३