अ‍ॅपशहर

'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'

बिहार निवडणुकीमुळे देशात रोजगाराचा मुद्दा तापला आहे. करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेला आहेत. यामुळे सरकारी नोकऱ्या आणि बेरोजगारीवरून राजकारण रंगलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2020, 7:49 pm
पणजीः बिहार निवडणुकीत बेरोजगारी आणि सरकारी नोकरीच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. आता यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उडी घेतली आहे. देव जरी खाला आणि एका राज्याचा मुख्यमंत्री झाला तर तोही प्रत्येक बेरोजगाराला सरकारी नोकरी देऊ शकत नाही, असं गोव्याचे सीएम प्रमोद सावंत हे शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pramod sawant goa cm
'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'


सरकारी नोकऱ्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने चर्चेची सुरुवात झाली. तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलंय. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टीका केली. तसंच सर्वांनाच सरकारी नोकरी दिली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट केलं. नितीशकुमार यांच्यासारखेच प्रमोद सावंत यांनी नोकऱ्यांसदर्भात भाष्य केलं आहे.

ग्रामपंचायत प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलले

प्रत्येकाला सरकारी नोकरी देणं शक्य नाही. उद्या देव देखील राज्यात मुख्यमंत्री झाले तर तेही १०० टक्के नागरिकांना सरकारी नोकर्‍या देऊ शकत नाहीत. सरकारी नोकऱ्या केवळ प्रमाणातच शक्य आहेत. पण रोजगारासाठी इतर अनेक पर्यायांचा विचार करता येईल, असं गोव्यातील ग्रामपंचायत प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. बिहार निवडणुकीदरम्यान देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चेच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचं हे विधान समोर आलं आहे.

काय म्हणाले प्रमोद सावंत?


'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'

'फ्रान्समधील हल्ले योग्यच, हत्यांसाठी भाग पाडू नका'

बिहार निवडणुकीत बेरोजगारी हा मुख्य मुद्दा

विरोधकांच्या अजेंडावर सप्टेंबरपासून बेरोजगारीचा मुद्दा आहे. बिहारच्या निवडणुकीच्या काळात भाजप आणि एनडीएला घेरण्यासाठी बेरोजगारीच्या मुद्यावर कॉंग्रेससह विरोधी पक्ष नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करत आहेत. अलिकडेच तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना सवाल केला. आपण सर्वांना सरकारी नोकरी देणार असाल तर पगारासाठी पैसे कुठून आणणार? असं नितीशकुमार म्हणाले. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सरकार आल्यानंतर १० लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात १९ लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलं आहे. या नोकर्‍या केवळ सरकारमध्येच नव्हे तर खासगी व इतर क्षेत्रातही दिल्या जातील, असं भाजपने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज