अ‍ॅपशहर

२०१६ मध्ये ३७% भारतीय महिलांची आत्महत्या

२०१६ मध्ये जगभरात जितक्या महिलांनी आत्महत्या केली त्यापैकी प्रत्येक तिसरी महिला भारतीय आहे. लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित झालं आहे. २०१६ मध्ये आत्महत्या केलेल्या महिलांपैकी ३७ टक्के महिला तर २४.३ टक्के पुरुष भारतीय होते.

Durgesh Nandan Jha | TNN 14 Sep 2018, 4:15 am
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suicide


२०१६ मध्ये जगभरात जितक्या महिलांनी आत्महत्या केली त्यापैकी प्रत्येक तिसरी महिला भारतीय आहे. लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये हे सर्वेक्षण प्रकाशित झालं आहे. २०१६ मध्ये आत्महत्या केलेल्या महिलांपैकी ३७ टक्के महिला तर २४.३ टक्के पुरुष भारतीय होते.

हा अभ्यास करणाऱ्या प्रमुख संशोधनकर्त्यांपैकी एक राखी डांडोना यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. आत्महत्या करणाऱ्या महिलांमध्येही विवाहित महिलांची संख्या अधिक आहे.

डांडोना म्हणाल्या, 'कमी वयात लग्न होणं किंवा अरेंज्ड मॅरेज, कमी वयात आई होणं, कौटुंबिक हिंसा किंवा अशाच सामाजिक समस्या महिलांच्या तणावाचं कारण असतं. आर्थिक स्वावलंबी नसल्यानेही त्या असुरक्षित असतात. बहुतांश महिलांकडे मानसिक तणावातून बाहेर पडण्याचं साधनही नसतं. या सर्व कारणांमुळे महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण अधिक असू शकतं.'

अभ्यासानुसार, '१९९० ते २०१६ दरम्यान आत्महत्येच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये भारतात अंदाजे २,३०,३१४ लोकांनी आत्महत्या केली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये पुरुषांचं आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे.'

अभ्यासानुसार, भारतात प्रति १ लाख महिलांपैकी १५ महिलांनी आत्महत्या केली आहे. १९९०च्या तुलनेत २०१६ मध्ये ही आकडेवारी दुपटीहून अथिक आहे. १९९० मध्ये ही संख्या प्रति १ लाख महिलांपैकी ७ होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज