कोलकाता:
भाजप सरकारविरोधात देशात तयार होणाऱ्या महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण असेल, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं बोललं जातं. तर येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ राजकीय चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीनंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाआघाडीचा चेहरा कोण असेल? असा सवाल करण्यात आला. तेव्हा महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण असेल. मात्र देशाला वाचवण्यासाठी भाजपविरोधातील लढाईत आम्ही सर्व एकत्र असून आम्ही आज भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ज्येष्ठ नेता म्हणून माझ्या आणि ममता बॅनर्जी यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. आम्हाला देशातील लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला देशातील यंत्रणा वाचवायच्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकशाही संकटात सापडली आहे. सीबीआय, ईडी आणि आरबीआयसहीत अनेक संस्थांवर दबाव टाकला जात आहे, असं नायडू यांनी सांगितलं.
दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी होणारी विरोधकांची बैठक स्थिगित करण्यात येत असल्याची घोषणा नायडू यांनी केली. भाजपविरोधी आघाडीची रुपरेषा तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता दोन महिन्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजप सरकारविरोधात देशात तयार होणाऱ्या महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण असेल, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं बोललं जातं. तर येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ राजकीय चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीनंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाआघाडीचा चेहरा कोण असेल? असा सवाल करण्यात आला. तेव्हा महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण असेल. मात्र देशाला वाचवण्यासाठी भाजपविरोधातील लढाईत आम्ही सर्व एकत्र असून आम्ही आज भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ज्येष्ठ नेता म्हणून माझ्या आणि ममता बॅनर्जी यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. आम्हाला देशातील लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला देशातील यंत्रणा वाचवायच्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकशाही संकटात सापडली आहे. सीबीआय, ईडी आणि आरबीआयसहीत अनेक संस्थांवर दबाव टाकला जात आहे, असं नायडू यांनी सांगितलं.
दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी होणारी विरोधकांची बैठक स्थिगित करण्यात येत असल्याची घोषणा नायडू यांनी केली. भाजपविरोधी आघाडीची रुपरेषा तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता दोन महिन्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.