अ‍ॅपशहर

राज्यातील जनावरांचा विमा उतरविणार

राज्यातील प्रत्येक जनावराचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. दुष्काळग्रस्त भागातील गावांमध्ये दुग्ध विकास कार्यक्रम राबवणार असून याअंतर्गत प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी उपलब्ध करून देणास असल्याचेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Times 3 Oct 2016, 7:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम evey animal in the state will be insured with insurance policysays minister mahadevjankar
राज्यातील जनावरांचा विमा उतरविणार


राज्यातील प्रत्येक जनावराचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. दुष्काळग्रस्त भागातील गावांमध्ये दुग्ध विकास कार्यक्रम राबवणार असून याअंतर्गत प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी उपलब्ध करून देणास असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रिपद स्वीकारल्यानंतर जानकर यांनी प्रथमच येथील महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यावेळी उपस्थित होते.

जानकर म्हणाले, राज्यातील प्रत्येक जनावराचा विमा उतरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अंतर्गत गायी, म्हशी, शेळी, मेंढी, घोडे, आदी जनावरांचा विमा काढून आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना साडे आठ कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारा कृषी पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्त्वाचे आहे. यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विदर्भ व मराठवाडयातील दुष्काळग्रस्त ११ जिल्हयातील २ हजारांहून अधिक गावांमध्ये दुग्ध विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गंत प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीतून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी ही योजना आखली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी २ हजार गांवाचा या कार्यक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील आजारी जनावरांचा वेळेत व योग्य उपचार व्हावा म्हणून गावा-गावांमध्ये मोबाइल अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार असून मंत्रालयातून त्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. जनावरांसाठी ‘मुक्त गोठा’ पध्दत राबविण्याबाबत विचार सुरू आहे, असेही जानकर यांनी नमूद केले.

मत्स्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून झारखंड राज्याच्या धर्तीवर राज्यात ‘केज कल्चर’ विकसीत करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. गोडया व खाऱ्या पाण्यातील मासेमारींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज