आंध्रप्रदेश:
१९९९ पासून एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरतं आहे. यामुळे एक्झिट पोल्सने दिलेल्या कलाला निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात अशी भीती भाजपचे माजी नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एका अनौपचारिक बैठकीला नायडू यांनी रविवारी संबोधित केलं. यावेळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच सर्वांनी नायडूंचे अभिनंदन करत भाजप सत्तेत येईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी एक्झिट पोल्सबद्दल नायडू यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. ' १९९९ पासून जाहीर झालेले एक्झिट चुकीचे ठरत गेले आहेत. २३मेला जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात.' प्रत्येकच पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. त्यामुळे निकालाच्या दिवशी प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. पण या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असं मानणं चुकीचं आहे असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. देशात कोण सत्तेत येईल याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, 'देशात कोण सत्तेत येईल हे मला माहित नाही. कोणी यावे याबद्दल मी बोलणार नाही. पण आज देशाला एका स्थिर सरकारची आणि शक्तीशाली नेत्याची नितांत गरज आहे.'
रविवारी जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं भाकीत केलं आहे. सर्व एक्झिट पोल्सची सरासरी काढली तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक्झिट पोल्सचे भाकीत खोटे ठरेल, २००४सारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल असं मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलं आहे. याउलट भाजप एकहाती ३००चा आकडा पार करेल असा विश्वास अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. अशावेळी नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यात यानिमित्ताने अंजन घातल्याचं बोललं जातं आहे.
वाचा लेख:
१९९९ पासून एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरतं आहे. यामुळे एक्झिट पोल्सने दिलेल्या कलाला निकाल म्हणून पाहता येणार नाही. खरे निकाल वेगळे असू शकतात अशी भीती भाजपचे माजी नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एका अनौपचारिक बैठकीला नायडू यांनी रविवारी संबोधित केलं. यावेळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच सर्वांनी नायडूंचे अभिनंदन करत भाजप सत्तेत येईल अशी आशा व्यक्त केली. यावेळी एक्झिट पोल्सबद्दल नायडू यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. ' १९९९ पासून जाहीर झालेले एक्झिट चुकीचे ठरत गेले आहेत. २३मेला जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात.' प्रत्येकच पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. त्यामुळे निकालाच्या दिवशी प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. पण या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असं मानणं चुकीचं आहे असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. देशात कोण सत्तेत येईल याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, 'देशात कोण सत्तेत येईल हे मला माहित नाही. कोणी यावे याबद्दल मी बोलणार नाही. पण आज देशाला एका स्थिर सरकारची आणि शक्तीशाली नेत्याची नितांत गरज आहे.'
रविवारी जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं भाकीत केलं आहे. सर्व एक्झिट पोल्सची सरासरी काढली तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एक्झिट पोल्सचे भाकीत खोटे ठरेल, २००४सारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवेल असं मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलं आहे. याउलट भाजप एकहाती ३००चा आकडा पार करेल असा विश्वास अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. अशावेळी नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यात यानिमित्ताने अंजन घातल्याचं बोललं जातं आहे.
वाचा लेख: