नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात तब्बल ६१४८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. करोना सुरू झाल्यापासूनचे आतापर्यंतचे हे सर्वात जास्त मृत्यू आहेत. मृत्यूचा आकडा अचानक एवढा वाढण्यामागचं कारण म्हणजे बिहारमधील समावेश नसलेल्या ३९५१ मृत्यूंचा समावेशही या आकडेवारीत करण्यात आला आहे. बिहारमधील सुधारित आकडेवारी वगळल्यास गेल्या २४ तासातील एकूण मृत्यू २१९७ एवढे आहेत. बिहारने बुधवारी करोना मृतांची सुधारित आकडेवारी जाहीर केली. यामुळे बिहारमधील एकूण मृत्यू ९४२९ एवढे झाले आहेत. दरम्यान, बिहारमधील ३९५१ पैकी बहुतांश मृत्यू हे दुसऱ्या लाटेतच झाले आहेत. बिहारमध्ये ७ जूनपर्यंत मृतांचा एकूण आकडा ५४२४ एवढा होता, तर गेल्या २४ तासात २० जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू असलेल्या राज्यांमध्ये बिहार आता १७ वरुन १२ व्या क्रमांकावर आलं आहे. या अतिरिक्त आकडेवारीने बिहारमधील करोना मृत्यूंचं प्रमाण ४२.१ टक्क्याने वाढलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मृत्यू पाटणामध्ये नोंदवण्यात आले. पाटण्यात एकूण २३०३ मृत्यू झाले आहेत. यानंतर मुजफ्फरपूर ६०९, नालंदा ४६३, बेगुसराय ४५४, पूर्व चंपारण ४२५, दरभंगा ३४२ आणि मधुबनीमध्ये ३१७ मृत्यू झाले आहेत.
सुधारित आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ५००० मृत्यूंची वाढ
बिहारसोबतच सर्वच राज्य सुधारित आकडेवारी जाहीर करत आहेत. गेल्या १२ दिवसात महाराष्ट्रातही ५००० मृत्यूंची सुधारित आकडेवारीतून वाढ झाली आहे. १७ मे ते २८ मे या काळात महाराष्ट्राच्या मृतांच्या आकडेवारीत ११७१२ मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६६२२ दैनंदिन होणारे मृत्यू आहेत, तर ५०९० मृत्यू सुधारित आकडेवारीतून समोर आले.
महाराष्ट्रात समोर आलेले बहुतांश मृत्यू पुणे, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, भंडारा, अहमदनगर आणि वर्धा या जिल्ह्यातून समोर आले आहेत. मृतांचे आकडे समोर न येण्यामागे तांत्रिक अडथळे आणि आरोग्य यंत्रणेवरील अतिरिक्त ताण असं कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.
सर्वाधिक मृत्यू असलेल्या राज्यांमध्ये बिहार आता १७ वरुन १२ व्या क्रमांकावर आलं आहे. या अतिरिक्त आकडेवारीने बिहारमधील करोना मृत्यूंचं प्रमाण ४२.१ टक्क्याने वाढलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मृत्यू पाटणामध्ये नोंदवण्यात आले. पाटण्यात एकूण २३०३ मृत्यू झाले आहेत. यानंतर मुजफ्फरपूर ६०९, नालंदा ४६३, बेगुसराय ४५४, पूर्व चंपारण ४२५, दरभंगा ३४२ आणि मधुबनीमध्ये ३१७ मृत्यू झाले आहेत.
सुधारित आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ५००० मृत्यूंची वाढ
बिहारसोबतच सर्वच राज्य सुधारित आकडेवारी जाहीर करत आहेत. गेल्या १२ दिवसात महाराष्ट्रातही ५००० मृत्यूंची सुधारित आकडेवारीतून वाढ झाली आहे. १७ मे ते २८ मे या काळात महाराष्ट्राच्या मृतांच्या आकडेवारीत ११७१२ मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६६२२ दैनंदिन होणारे मृत्यू आहेत, तर ५०९० मृत्यू सुधारित आकडेवारीतून समोर आले.
महाराष्ट्रात समोर आलेले बहुतांश मृत्यू पुणे, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, भंडारा, अहमदनगर आणि वर्धा या जिल्ह्यातून समोर आले आहेत. मृतांचे आकडे समोर न येण्यामागे तांत्रिक अडथळे आणि आरोग्य यंत्रणेवरील अतिरिक्त ताण असं कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे.