अ‍ॅपशहर

कृषी कायदे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सिद्धू म्हणाले, 'कोणतीही मध्यस्थी...'

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी मंगळवारी निकाल दिला. पण शेतकऱ्यांनी कोर्टाच्या निकालानंतरही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. आता काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2021, 11:31 pm
नवी दिल्ली: कृषी कायद्यांसंबंधित ( farm laws ) प्रकरणात शेतकर्‍यांच्या शंका आणि तक्रारींचा विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ( supreme court ) निर्णयावर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट केलं आहे. 'लोकशाहीत लोकप्रतिनिधी कायदे करतात, न्या न्यायालये किंवा समित्या नव्हे... कोणतीही मध्यस्था किंवा चर्चा शेतकरी आणि संसद यांच्यात व्हायला हवी असं', असं सिद्धू म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navjot singh sidhu
कृषी कायदे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सिद्धू म्हणाले, 'कोणतीही मध्यस्थी...'


सिद्धू यांच्या आधी कॉंग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनीही प्रतिक्रिया दिली. कृषी कायद्यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेल्या चिंतेचं आम्ही स्वागत करतो. पण स्थापन केलेली चार सदस्यांची समिती धक्कादायक आहे. या चार सदस्यांनी यापूर्वीच कृषी कायद्यांच्या बाजूने भूमिका मांडलेली आहे. यामुळे ते शेतकर्‍यांना कोणता न्याय देतील, हा मोठा प्रश्न आहे, असं काँग्रेसने म्हटलंय.

'कृषी कायद्यांचा विरोध नाही हे तर सीएए, एनआरसी, अनुच्छेद ३७० चं दु:ख'

'कृषी कायदे बनवणारेच सुप्रीम कोर्टाच्या समितीत, आंदोलन सुरूच राहणार'

सुप्रीम कोर्टाची समिती

सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांसंबंधी चार सदस्यांची समिती स्थापन केलीय. यात हरसिमरत मान, अशोक गुलाटी, डॉ. प्रमोद कुमार जोशी आणि अनिल घनवट यांचा समावेश आहे. या समितीने १० दिवसांच्या आत पहिली बैठक घ्यावी. तसंच २ महिन्यात आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज