अ‍ॅपशहर

rakesh tikait : टिकैत भाजपवर बरसले, 'आमच्या व्यासपीठावर दिसले तर एकेकाचे बक्कल काढू'

केंद्राच्या तीन नवीन कृषी काद्यांविरोधात शेतकऱ्यांचे अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली-यूपी दरम्यानच्या गाझीपूर सीमेवर आज भाजप कार्यकर्ते आणि आंदोलनकर्त्यांमध्ये राडा झाला. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचीही तोडफोड झाल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2021, 8:30 pm
नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी राडा झाला. भाजपचे काही कार्यकर्ते आपल्या एका नेत्याचे स्वागत करण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहोचले. ते येताच या ठिकाणी मोठा राडा सुरू झाला. यावरू शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ( rakesh tikait ) इशारा दिला आहे. भाजपे नेते कार्यकर्ते इथे आले तर एकेकाचे बक्कल काढूले जाईल. हे शेतकऱ्यांच्या संयुक्त मोर्चाचे व्यासपीठ आहे. यावर कुणीलाही कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये, अस टिकैत म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rakesh Tikait
टिकैत भाजपवर बरसले, 'आमच्या व्यासपीठावर दिसले तर एकेकाचे बक्कल काढू'


रस्ता सर्वांचा आहे. पण शेतकऱ्यांच्या संयुक्त मोर्चाच्या व्यासपीठावर कुणीही कब्जा करू शकत नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांना कुठेही फिरू दिले जाणार नाही. झेंडा लावून व्यासपीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर 'उपचार' केला जाईल, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे.

व्यासपीठावर कब्जा करून कुणाच्याही स्वागताला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते. हे सर्व पोलिसांच्या उपस्थित घडलं आहे. व्यासपीठावर कब्जा करून आपल्या नेत्यांचे स्वागत करून दाखवण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. व्यासपीठ हवे आहे तर मग आंदोलनात सहभागी का होत नाही? असा प्रश्न टिकैत यांनी केला.

कुणी आपल्या झेंडा घेऊन येत असले तर त्याला तुम्ही काळे झेडें दाखवले जातील. कुठल्याही गाडीची तोडफोड करण्यात आलेली नाही. हे काम त्यांनी केले आहे. गेल्या ७ महिन्यांत इथून हजारो गाड्या गेल्या. कुठल्याही गाडीवर दगडफेक झालेली नाही, असा दावा टिकैत यांनी केला. या घटनेत काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच काही गाड्यांचंही नुकसान झालं आहे.

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या विरोधाचा आम्ही आदर करतो. राजकीय नेत्यांनी धैर्य राखत विरोधाचा सामना केला आहे. पण कुणीही आपली मर्यादा ओलांडनं योग्य ठरणार नाही, असं हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले. गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झडपेनंतर खट्टर यांचे हे वक्तव्य आले आहे.

ramdev baba : सुप्रीम कोर्टाने सुनावले, ' रामदेव बाबा अॅलोपॅथी आणि डॉक्टरांबद्दल जे काही

शेतकरी हा शब्द शुद्ध आणि पवित्र आहे. प्रत्येकजण त्याचा सन्मान ठेवून आहे. पण काही दुर्दैवी घटनांमुले हा शब्द कलंकित झाला आहे. माता-भगिनींच्या अब्रुवर हात टाकला गेला आहे. खून होत आहे. रस्ते अडवले जात आहेत. अशा घटना या लोकशाही विरोधी आहेत. त्यांचा आपण निषेध करतो, असं मनोहरलाल खट्टर म्हणाले.

supreme court : करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या, सुप्रीम

महत्वाचे लेख