अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांचे उपोषण; शेतकऱ्यांचे प्रतिउपोषण

मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केलेल्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांनीही उपोषण सुरू केले आहे. चौहान यांच्याकडून कर्जमाफीचे आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी हे उपोषण सुरू ठेवणार आहेत.

Maharashtra Times 10 Jun 2017, 9:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । भोपाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers also starts fast in front of cm shivraj singh chouhan
मुख्यमंत्र्यांचे उपोषण; शेतकऱ्यांचे प्रतिउपोषण


मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केलेल्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांनीही उपोषण सुरू केले आहे. चौहान यांच्याकडून कर्जमाफीचे आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी हे उपोषण सुरू ठेवणार आहेत.

आम किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी शनिवारी सायंकाळी मुख्ममंत्र्यांची दशहरा मैदानात भेट घेतली आणि त्यांच्यासमोर कर्जमाफी आणि हमीभाव या मागण्या ठेवल्या. 'मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे मी आणि अन्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे उपोषण सुरू आहे, त्याच मंडपात उपोषण सुरू केले आहे,' अशे आम किसान युनियनचे केदार सिरोही म्हणाले.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच या शेतकऱ्यांना चर्चेला बोलावले होते. सकाळी उपोषण सुरू करण्याआधी चौहान म्हणाले होते की, 'राज्य सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, खत आणि बियाणांसाठी एक लाखांपर्यंत कर्ज घेतल्यावर सवलत आदि निर्णय घेतले. शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा आपत्ती आली, तेव्हा सरकार त्यांच्यासोबत होते.'

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भोपाळ येथील दशहरा मैदानावर उपोषण सुरू केले आहे. व्यासपीठावर त्यांच्या पत्नी साधना सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. जोपर्यंत राज्यातील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज