अ‍ॅपशहर

'सिंघू सीमा रिकामी करा'... आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा

कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात आता जनतेत नाराजी निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये ही नाराजी आहे. यामुळे सिंघू सीमेला लागून असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोर्चा काढत त्यांना सिंघू सीमा रिकामी करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2021, 5:58 pm
नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा फटका शेतकरी आंदोलनाला ( farmers protest ) बसल्याचं आता दिसून येत आहे. दिल्ली आणि हरयाणादरम्यान, सिंघू सीमेवर ( singhu border ) नागरिकांनी मोर्चा काढला. आजूबाजूच्या खेड्यात राहणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते सिंघू सीमेवर जमले आहेत. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी आता सिंघू सीमा रिकामी करावी. लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसक घटनेने आम्ही दुखावले गेले आहेत. आम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही. बरेच दिवस झाले. आता सिंघू सीमा रिकामी करा. या काळात आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं त्यांचं म्हणणं आहे. सींघू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. पोलिस रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेड्स लावण्याच्या प्रयत्नात आहेत. पण त्याला आंदोलकांचा विरोध आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Singhu border
'सींघू सीमा रिकामी करा'... आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आता नागरिकांचा मोर्चा


'खूप झालं, आता सिंघू सीमा रिकामी करा'

राष्ट्रध्वजाचा अपमान हिंदुस्थान खपवून घेणार नाही' अशा घोषणा देत काही नागरिक गुरुवारी सिंघू सीमेवर पोहोचले. त्यांच्या हातात या घोषणा असलेले बॅनर होते. "संपूर्ण रस्ता अडवून ठेवला आहे आणि आम्ही शेतातूनही ते जात आहेत. आता आंदोलकांनी सिंघू सीमा रिकामी करावी, अशी त्यांची मागणी आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी सिंघू सीमेसह दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठिय्या मांडून आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर चिल्ला सीमेवरील धरणे आंदोलन संपुष्टात आले आहे. गाझीपूर सीमेवरील तंबूही जवळजवळ हटवण्यात आले आहेत.

Tractor Rally : शेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार

आंदोलकांना रस्त्याच्या एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी सिंघू सीमेवर बॅरिकेडींग करून पोलिस बंदोबस्त करत आहेत. पण आंदोलकांचा त्याला विरोध आहे. एकूण सिंघू सीमेवरील परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात

नोएडा, गाझियाबाद सीमेवर धरणे आंदोलन संपुष्टात

भारतीय किसान युनियनमधील लोकशक्ती गटाने गुरुवारी आपले धरणे आंदोलन संपवल्याची घोषणा केली. ते गेल्या ५८ दिवसांपासून दलित प्रेरणास्थळावर प्रदर्शन करत होते. पलवलमध्येही शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन संपवलं आहे. त्यांनी सामानाची बांधाबांध सुरू केली आहे. प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने दुखावले गेलो आहोत. पण आंदोलन सुरूच राहील. ३० जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीला उपोषण करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज