नवी दिल्ली : करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरलेत. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाची तरतुदी कायद्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा वाढताना दिसतोय. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केलंय. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतलाय.
राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवणार पुरस्कार
या खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार सन्मानित खेळाडू सज्जन सिंह चीमा आणि हॉकी खेळाडू राजबीर कौर यांचाही समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती भवनाबाहेर आपला पुरस्कार ठेवणार असल्याचं या खेळाडूंकडून सांगण्यात आलं.
दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं तसंच हरयाणातील खट्टर सरकारनं थंडीच्या दिवसांत आंदोलकांवर पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला, या कृत्याची निंदाही खेळाडूंकडून करण्यात आली.
वाचा : शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा चहा नाकारला, नेत्यांना 'लंगर'चं आमंत्रण
वाचा :सर्वोच्च न्यायालय अवमान : कुणाल कामरानंतर कार्टुनिस्टविरुद्ध कारवाई
'आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि ते गेल्या अनेक महिन्यांपासून शांतीपूर्ण मार्गानं आंदोलन करत आहेत. या काळात एकही हिंसक घटना घडली नाही. परंतु, आंदोलक दिल्लीला निघाले असताना त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. आमच्या ज्येष्ठांचा आणि बंधुंच्या पगडीचा अवमान झाला तर आम्ही आमच्या पुरस्कार आणि सन्मानाचं काय करणार?', असा प्रश्न विचारणाऱ्या चीमा यांना ३० हून अधिक माजी ऑलम्पिक आणि इतर खेळांत पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंकडून समर्थन मिळालंय. यामध्ये गुरमेल सिंह आणि सुरिंदर सिंह सोढी यांचाही समावेश आहे. हे दोघेही १९८० मॉस्को ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे सदस्य होते.
जर हे कायदे शेतकऱ्यांनाच नकोत तर केंद्राकडून त्यांच्यावर हे कायदे का लादले जात आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.
वाचा : अखेर सरकार झुकलं, आजच शेतकऱ्यांशी बिनशर्त चर्चेसाठी तयार
वाचा : आंदोलन करणारे बहुतेकजण शेतकरी वाटत नाहीतः व्हीके. सिंह
राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवणार पुरस्कार
या खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार सन्मानित खेळाडू सज्जन सिंह चीमा आणि हॉकी खेळाडू राजबीर कौर यांचाही समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती भवनाबाहेर आपला पुरस्कार ठेवणार असल्याचं या खेळाडूंकडून सांगण्यात आलं.
दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं तसंच हरयाणातील खट्टर सरकारनं थंडीच्या दिवसांत आंदोलकांवर पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला, या कृत्याची निंदाही खेळाडूंकडून करण्यात आली.
वाचा : शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा चहा नाकारला, नेत्यांना 'लंगर'चं आमंत्रण
वाचा :सर्वोच्च न्यायालय अवमान : कुणाल कामरानंतर कार्टुनिस्टविरुद्ध कारवाई
'आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि ते गेल्या अनेक महिन्यांपासून शांतीपूर्ण मार्गानं आंदोलन करत आहेत. या काळात एकही हिंसक घटना घडली नाही. परंतु, आंदोलक दिल्लीला निघाले असताना त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. आमच्या ज्येष्ठांचा आणि बंधुंच्या पगडीचा अवमान झाला तर आम्ही आमच्या पुरस्कार आणि सन्मानाचं काय करणार?', असा प्रश्न विचारणाऱ्या चीमा यांना ३० हून अधिक माजी ऑलम्पिक आणि इतर खेळांत पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंकडून समर्थन मिळालंय. यामध्ये गुरमेल सिंह आणि सुरिंदर सिंह सोढी यांचाही समावेश आहे. हे दोघेही १९८० मॉस्को ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे सदस्य होते.
जर हे कायदे शेतकऱ्यांनाच नकोत तर केंद्राकडून त्यांच्यावर हे कायदे का लादले जात आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.
वाचा : अखेर सरकार झुकलं, आजच शेतकऱ्यांशी बिनशर्त चर्चेसाठी तयार
वाचा : आंदोलन करणारे बहुतेकजण शेतकरी वाटत नाहीतः व्हीके. सिंह