चंदीगड: देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्दू (Navjot Singh Siddhu) यांनी भाष्य केले आहे. देश उपासमार आणि दुष्काळाच्या (hunger and famine) मार्गावर चालला आहे, असे सिद्धू यांनी म्हटले आहे. अनेक वर्षे भाजपत (BJP) राजकारण केल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेल्या सिद्धू यांनी देशात धनसंपत्तीचे असमान वाटप असल्याचे सांगत त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (we are on the path to extreme hunger and famine says congress leader navjot singh sidhu)
नवज्योतसिंह सिद्धू यांनी ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'भारतातील केवळ एक टक्का सर्वात धनवान व्यक्तीकडे, खालच्या ७० टक्के लोकांच्या तलनेतही अधिक संपत्ती आहे. गरीब अतिशय मेहनत करतात मात्र धनवानांच्या संपत्तीत वाढ होते. शेतकरी श्रम करतात, मात्र भांडवलदार कमाई करतात. गेल्या सहा महिन्यांमध्ये अंबानी यांनी दर तासाला आपल्या संपत्तीत ९० कोटी रुपयांची वाढ केली आहे. तर अडानी यांची संपत्ती ६१ टक्क्यांनी वाढली आहे.'
क्लिक करा आणि वाचा बातमी- हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी मुस्लिम तरुणाचे धर्मांतर, पोलिसांनी दिले संरक्षण
नवज्योतसिंह सिद्धू यांनी हंगर इंडेक्समधील भारताच्या कमकुवत स्थानाकडेही इशारा केला आहे. सिद्धू यांनी लिहिले, 'ग्लोबल हंगर इंडेक्समधील १०७ देशांमध्ये भारताचे स्थान ९४ वे आहे. आम्ही मोठ्या उपासमार आणि दुष्काळाच्या कड्यावर उभे आहोत. दुष्काळ हा केवळ खाद्य सामग्रीच्या कमतरतेमुळेच येत नाही. खाद्यान्न, खाद्य सामग्री तर आहेच, मात्र ती भांडवलवाद्यांचे कोल्ड स्टोरेज आणि वेयरहाऊसमध्ये जमा आहे आणि ती गरिबांच्या क्रय क्षमतेच्या बाहेर आहे.'
क्लिक करा आणि वाचा बातमी- लग्नसोहळ्याहून परतताना स्कॉर्पिओवर ट्रक उलटला; ८ ठार, २ जखमी
क्लिक करा आणि वाचा बातमी- Corona Vaccine News: कोविशील्ड चाचणीचे 'साइड इफेक्ट', लस उशिरा येणार?
नवज्योतसिंह सिद्धू यांनी ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'भारतातील केवळ एक टक्का सर्वात धनवान व्यक्तीकडे, खालच्या ७० टक्के लोकांच्या तलनेतही अधिक संपत्ती आहे. गरीब अतिशय मेहनत करतात मात्र धनवानांच्या संपत्तीत वाढ होते. शेतकरी श्रम करतात, मात्र भांडवलदार कमाई करतात. गेल्या सहा महिन्यांमध्ये अंबानी यांनी दर तासाला आपल्या संपत्तीत ९० कोटी रुपयांची वाढ केली आहे. तर अडानी यांची संपत्ती ६१ टक्क्यांनी वाढली आहे.'
क्लिक करा आणि वाचा बातमी- हिंदू मुलीशी विवाह करण्यासाठी मुस्लिम तरुणाचे धर्मांतर, पोलिसांनी दिले संरक्षण
नवज्योतसिंह सिद्धू यांनी हंगर इंडेक्समधील भारताच्या कमकुवत स्थानाकडेही इशारा केला आहे. सिद्धू यांनी लिहिले, 'ग्लोबल हंगर इंडेक्समधील १०७ देशांमध्ये भारताचे स्थान ९४ वे आहे. आम्ही मोठ्या उपासमार आणि दुष्काळाच्या कड्यावर उभे आहोत. दुष्काळ हा केवळ खाद्य सामग्रीच्या कमतरतेमुळेच येत नाही. खाद्यान्न, खाद्य सामग्री तर आहेच, मात्र ती भांडवलवाद्यांचे कोल्ड स्टोरेज आणि वेयरहाऊसमध्ये जमा आहे आणि ती गरिबांच्या क्रय क्षमतेच्या बाहेर आहे.'
क्लिक करा आणि वाचा बातमी- लग्नसोहळ्याहून परतताना स्कॉर्पिओवर ट्रक उलटला; ८ ठार, २ जखमी
क्लिक करा आणि वाचा बातमी- Corona Vaccine News: कोविशील्ड चाचणीचे 'साइड इफेक्ट', लस उशिरा येणार?