चंदीगड : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला शेतकऱ्यांचा विरोधाचा सामाना ( farmers stopped actor kangana ranauts car ) करावा लागला. श्री किरतपूर साहिबमधील बुंगा साहिब येथे कथित शेतकऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या ताफ्याला घेराव घातला. यानंतर चंदीगड-उना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कंगनाने शेतकरी आणि महिलांची माफी मागावी, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. कंगनाने आमच्या महिलांची माफी मागावी. त्यानंतरच तिला येथून जाऊ देऊ, असे आंदोलक म्हणत आहे. शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मनालीहून चंदीगड येत होती कंगना
रोपड शहराजवळच्या बुंगा साहिबमध्ये कंगनाची गाडी शेतकऱ्यांनी अडवली. कंगनाला चंदीगड विमानतळावरून मुंबईची फ्लाइट पकडायची आहे. शेतकऱ्यांसह महिलाही येथे उपस्थित आहेत. आणि कंगनाने माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. आंदोलनासाठी १०० रुपये देऊन महिलांना आणलं जातंय. तसंच आंदोलन करणारे हे खलिस्तानी अतिरेकी आहेत, असं कंगना म्हणाली होती. राहुल गांधींचा PM मोदींवर थेट आरोप; 'उद्योगपती मित्राचे काम असेल तर...
मी हिमाचल प्रदेशातून निघाले. पंजाबमध्ये येताच आपल्याला जमावाने घेरलं. ते शेतकरी असल्याचं सांगत आहेत. शिवीगाळ करत आहेत. जीवे मारण्याची धमकी देत आहेत. देशात अशा प्रकारे मॉब लिंचिंग होत आहे. आमच्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर काय स्थिती झाली असती? मोठ्या संख्येत पोलीस आहेत. तरीही जाऊ दिलं जात नाहीए. मी कोणी राजकीय नेता आहे का? अनेक जण आपल्याविरोधात राजकारण करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. जमावाने आपल्याला घेरलं आहे. आणि पोलीस नसते तर आतापर्यंत माझी मॉब लिंचिंग झाली असती, असं कंगनाने म्हटलं आहे.
bhayyuji maharaj : भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ही पलक कोण?
पंजाबमध्ये शतेकऱ्यांनी आपल्या कारवर हल्ला केला आहे, असाही आरोप कंगनाने केला आहे. यासंबंधी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
मनालीहून चंदीगड येत होती कंगना
रोपड शहराजवळच्या बुंगा साहिबमध्ये कंगनाची गाडी शेतकऱ्यांनी अडवली. कंगनाला चंदीगड विमानतळावरून मुंबईची फ्लाइट पकडायची आहे. शेतकऱ्यांसह महिलाही येथे उपस्थित आहेत. आणि कंगनाने माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. आंदोलनासाठी १०० रुपये देऊन महिलांना आणलं जातंय. तसंच आंदोलन करणारे हे खलिस्तानी अतिरेकी आहेत, असं कंगना म्हणाली होती.
मी हिमाचल प्रदेशातून निघाले. पंजाबमध्ये येताच आपल्याला जमावाने घेरलं. ते शेतकरी असल्याचं सांगत आहेत. शिवीगाळ करत आहेत. जीवे मारण्याची धमकी देत आहेत. देशात अशा प्रकारे मॉब लिंचिंग होत आहे. आमच्यासोबत सुरक्षा रक्षक नसते तर काय स्थिती झाली असती? मोठ्या संख्येत पोलीस आहेत. तरीही जाऊ दिलं जात नाहीए. मी कोणी राजकीय नेता आहे का? अनेक जण आपल्याविरोधात राजकारण करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. जमावाने आपल्याला घेरलं आहे. आणि पोलीस नसते तर आतापर्यंत माझी मॉब लिंचिंग झाली असती, असं कंगनाने म्हटलं आहे.
bhayyuji maharaj : भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ही पलक कोण?
पंजाबमध्ये शतेकऱ्यांनी आपल्या कारवर हल्ला केला आहे, असाही आरोप कंगनाने केला आहे. यासंबंधी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.