अ‍ॅपशहर

या बापाने दुचाकीवरून आणला मुलीचा मृतदेह

कानाने नीटसे ऐकू न येणाऱ्या आणि सर्वसामान्य मुलांपेक्षा शरीराची वाढ खुंटित असणाऱ्या बंगळुरु येथील टी. रत्नम्माचा योग्य वेळी अॅम्ब्युलन्स सुविधा न मिळाल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पुढील दुर्दैव हे की, आपल्या लेकीचा असा अचानक मृत्यू झाला हे स्विकारणेच अवघड असणाऱ्या तिच्या कुटुंबियांना आपल्या मुलीचे शव दुचाकीवर(मोपेड) लादून घरी आणण्याची वेळ आली.

Rajiv Kalkod | Maharashtra Times 21 Feb 2017, 11:40 am
कानाने नीटसे ऐकू न येणाऱ्या आणि सर्वसामान्य मुलांपेक्षा शरीराची वाढ खुंटित असणाऱ्या बंगळुरु येथील टी. रत्नम्माचा योग्य वेळी अॅम्ब्युलन्स सुविधा न मिळाल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या पुढील दुर्दैव हे की, आपल्या लेकीचा असा अचानक मृत्यू झाला हे स्विकारणेच अवघड असणाऱ्या तिच्या कुटुंबियांना आपल्या मुलीचे शव दुचाकीवर(मोपेड) लादून घरी आणण्याची वेळ आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम father ferries dead daughter on moped
या बापाने दुचाकीवरून आणला मुलीचा मृतदेह


बंगळुरुपासून १५० किमी. अतंरावरील तुमाकुरू जिल्ह्यातील वीरापूर गावातील ही घटना असून गेल्या रविवारी डी. थिमाप्पा यांच्यावर हा प्रसंग ओढावला. त्यांची २० वर्षीय मुलगी टी. रत्नम्मा बोलू शकत नव्हती. तिची श्रवणशक्तीही कमी होती. शिवाय तिच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत तिची वाढही कमी होती. तिची आई गौरम्मा फुले विकते तर वडिल थिमाप्पा कुलीचे काम करतात.

टी. रत्नम्माला शनिवारी सकाळी ताप आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. त्यावेळी खिशात केवळ १५० रुपये असलेल्या तिच्या वडिलांनी घरापासून ६ किमी. अतंरावरील कोडिगेनाहल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. तिथल्या डॉक्टरांनी रत्नम्माला तपासून गोळ्या औषधे देऊन घरी पाठविले. त्या रात्री तिला अस्वस्थ वाटून जास्तच त्रास जाणवू लागला, म्हणून २१ किमी. दूर असलेल्या मधुगिरी येथील रुग्णालयात रत्नम्माला नेण्यासाठी आपण अॅम्ब्युलन्सला बोलविल्याचे थिमाप्पा सांगतात. मात्र अॅम्ब्युलन्स न आल्याने थिमाप्पांनी रत्नम्माला खासगी दवाखान्यात नेले. तिथे डॉ. राजू यांनी तिला ३ इंजेक्शन्स आणि काही औषधं दिली.

रात्री ११ वाजता थिमाप्पा आपल्या दुचाकीवरूनच रत्नम्माला घरी घेऊन आले. इंजेक्शन्स आणि औषधं घेऊनही रत्नम्माला आराम पडला नाही. तिला अधिकच अस्वस्थता जाणवत होती. पहाटे होता होता तिला श्वास घेणेही अवघड होऊ लागले आणि पहाटे ४ च्या सुमारास तिची तब्बेत जास्तच बिघडली. त्यामुळे थिमाप्पांनी पु्न्हा अॅम्ब्युलन्स बोलावून तिला मधुगिरी येथे नेण्याचे ठरविले. मात्र आदल्यादिवशी प्रमाणेच फोन करूनही अॅम्ब्युलन्स सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

अखेर सकाळी साडेसातच्या सुमारास रत्नम्माला दुचाकीवर लादून थिमाप्पा आणि त्यांचा मुलगा राजू यांनी कोडिगेनाहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला आणले. रत्नम्माची तब्बेत अधिकच गंभीर असल्याने तिला मधुगिरी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. ''मात्र आपल्याला अॅम्ब्युलन्स सुविधा मिळणार नाही, याची पूर्ण खात्री आम्हाला होती आणि म्हणून आम्ही पुन्हा रत्नम्माला डॉ. राजू यांच्याकडे आणले. त्यांनी तिला पाहताच मृत घोषित केले.'', असे थिमाप्पांचा मुलगा राजू सांगतो. त्यानंतर रत्नम्माचा मृतदेह घरी नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी अशी विनंती थिमाप्पांनी डॉक्टरांना केली. पण तिथूनही मदत मिळाली नाही. खिशात ९५ रुपयेच शिल्लक राहिल्याने स्वतः एखाद्या वाहनाची सोय करणेही थिमाप्पांना शक्य नव्हते. अखेर रत्नम्माचे शव आपल्या दुचाकीवर लादून थिमाप्पांना घरी परतावे लागले.

या सर्व प्रकरणात जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. रंगस्वामी यांनी दिलेले माहिती मात्र वेगळीच आहे. ''रत्नम्माच्या कुटुंबियांनी सरकारी सुविधांचा उपयोगच केला नसून अॅम्ब्युलन्ससाठीही फोन केला नव्हता. तरीही या प्रकरणामध्ये आम्ही चौकशी करत आहोत की, ते आपल्या मुलीच्या उपचारासाठी कोणता हकिमाकडे गेले होते का?, कारण या भागात डॉक्टरांकडे न जाता नीम-हकीमाकडे जाणं ही एक मोठी समस्या बनली आहे.", असे डॉ. रंगस्वामीनी सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात दोन प्रकारचे गट आहेत, एक हकिमांना मानणारा आणि दुसरा त्यांचा विरोध करणारा. डॉ, रंगस्वामींनीही याला दुजोरा देत म्हटले आहे की, "यापूर्वीही अशा जवळ जवळ १६३ हकिमांना पकडून त्यांची यादी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे."
लेखकाबद्दल
Rajiv Kalkod

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज