वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ज्येष्ठ चित्रपट निर्माते व अभिनेते कासिनाधूनी उर्फ के. विश्वनाथ यांना चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. ८७ वर्षीय विश्वनाथ यांच्या चित्रपटक्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्दीची दखल घेत २०१६च्या पुरस्कारासाठी त्यांनी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार मिळविणारे ते ४८वे कलाकार ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीत हा पुरस्कार अतिशय मानाचा मानला जातो. सुवर्णकमळ, १० लाख रुपयांचा रोख पुरस्कार व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तीन मे या दिवशी येथील विज्ञान भवनात विश्वनाथ यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीने विश्वनाथ यांची एकमताने निवड केली. यानंतर माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
विश्वनाथ यांनी शंकराभरणम, सागरसंगम, सप्तपदी, कामचोर, संजोग, जाग उठा इन्सान आदी अनेक यशस्वी तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पाच राष्ट्रीय व १० फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते व अभिनेते कासिनाधूनी उर्फ के. विश्वनाथ यांना चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. ८७ वर्षीय विश्वनाथ यांच्या चित्रपटक्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्दीची दखल घेत २०१६च्या पुरस्कारासाठी त्यांनी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार मिळविणारे ते ४८वे कलाकार ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीत हा पुरस्कार अतिशय मानाचा मानला जातो. सुवर्णकमळ, १० लाख रुपयांचा रोख पुरस्कार व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तीन मे या दिवशी येथील विज्ञान भवनात विश्वनाथ यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीने विश्वनाथ यांची एकमताने निवड केली. यानंतर माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
विश्वनाथ यांनी शंकराभरणम, सागरसंगम, सप्तपदी, कामचोर, संजोग, जाग उठा इन्सान आदी अनेक यशस्वी तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पाच राष्ट्रीय व १० फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.