म. टा. विशेष प्रतिनिधी, फगवाडा
'डिजिटल इंडियामुळे देशात मोठ्या प्रमाणावर माहिती तयार होत आहे. ही माहिती सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या माहितीचा कोणी दुरुपयोग केल्यास ते आम्हाला सहन होणार नाही. यामुळेच सरकार डेटा सुरक्षा कायदा तयार करत आहे. त्याचा मसुदा अंतिम झाला असून लवकरच त्यावर चर्चा होणार आहे', अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सायन्स कम्युनिकेटर चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज देशात १२१ कोटी मोबाइलधारक आहेत. यापैकी ४४ कोटी ६० लाख स्मार्टफोनधारक आहेत. जगातील सर्वाधिक फेसबुक आणि व्हॉट्सअॅप युजर्स भारतात आहेत. टि्वटर युजर्सच्या यादीत आपण तिसऱ्या क्रमांकावर येतो. हे सर्व होत असताना आपल्याकडून सर्वाधिक डेटा कंपन्यांना मिळत असतो. मात्र अनेकदा या डेटाची चोरी होते आणि युजर्सचे नुकसान होते. हे सर्व टाळण्यासाठी आपण देशात डेटा सुरक्षा कायदा लागू करत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. पारतंत्र्यामुळे आपण औद्योगिक क्रांतीपासून वंचित राहिलो, मात्र सध्या होत असलेल्या डिजिटल क्रांतीमध्ये आपण अव्वल व्हावे या उद्देशाने वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर इंडियन सायन्स काँग्रसेचे सचिव मनोज चक्रवर्ती आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल उपस्थित होते.
आकड्यांमध्ये डिजिटल भारत
- १२३ कोटी आधारकार्डधारक
- १२१ कोटी मोबाइलधारक
- ४४.६ कोटी स्मार्टफोनधारक
- २९ कोटी फेसबुक युजर्स
- २०२०मध्ये ५ जी सुरू होणार.
- भारतनेटअंतर्गत तीन लाख किमी ऑप्टिकल फायबरचे जाळे.
- ३३ कोटी बँक खाती आधारशी लिंक करण्यात आली असून यात गॅस सबसिडी दिली जाते.
- लायसन्स आधारशी कनेक्ट करणार.
- १२०० सरकारी सेवा अॅपवर आहेत.
- १२७ मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची सुरुवात.
- डिजिटल पेमेंटमध्ये वाढ. दोन वर्षांत ५२.४९ व्यवहारांमध्ये ४२ हजार कोटींची उलाढाल.
'डिजिटल इंडियामुळे देशात मोठ्या प्रमाणावर माहिती तयार होत आहे. ही माहिती सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या माहितीचा कोणी दुरुपयोग केल्यास ते आम्हाला सहन होणार नाही. यामुळेच सरकार डेटा सुरक्षा कायदा तयार करत आहे. त्याचा मसुदा अंतिम झाला असून लवकरच त्यावर चर्चा होणार आहे', अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सायन्स कम्युनिकेटर चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज देशात १२१ कोटी मोबाइलधारक आहेत. यापैकी ४४ कोटी ६० लाख स्मार्टफोनधारक आहेत. जगातील सर्वाधिक फेसबुक आणि व्हॉट्सअॅप युजर्स भारतात आहेत. टि्वटर युजर्सच्या यादीत आपण तिसऱ्या क्रमांकावर येतो. हे सर्व होत असताना आपल्याकडून सर्वाधिक डेटा कंपन्यांना मिळत असतो. मात्र अनेकदा या डेटाची चोरी होते आणि युजर्सचे नुकसान होते. हे सर्व टाळण्यासाठी आपण देशात डेटा सुरक्षा कायदा लागू करत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. पारतंत्र्यामुळे आपण औद्योगिक क्रांतीपासून वंचित राहिलो, मात्र सध्या होत असलेल्या डिजिटल क्रांतीमध्ये आपण अव्वल व्हावे या उद्देशाने वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर इंडियन सायन्स काँग्रसेचे सचिव मनोज चक्रवर्ती आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल उपस्थित होते.
आकड्यांमध्ये डिजिटल भारत
- १२३ कोटी आधारकार्डधारक
- १२१ कोटी मोबाइलधारक
- ४४.६ कोटी स्मार्टफोनधारक
- २९ कोटी फेसबुक युजर्स
- २०२०मध्ये ५ जी सुरू होणार.
- भारतनेटअंतर्गत तीन लाख किमी ऑप्टिकल फायबरचे जाळे.
- ३३ कोटी बँक खाती आधारशी लिंक करण्यात आली असून यात गॅस सबसिडी दिली जाते.
- लायसन्स आधारशी कनेक्ट करणार.
- १२०० सरकारी सेवा अॅपवर आहेत.
- १२७ मोबाइल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची सुरुवात.
- डिजिटल पेमेंटमध्ये वाढ. दोन वर्षांत ५२.४९ व्यवहारांमध्ये ४२ हजार कोटींची उलाढाल.