नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. या दरम्यान सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहिले. या दरम्यान भाजपकडून आपल्या खासदारांना सदनात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. या भाषणात अर्थमंत्र्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' वक्तव्यावरही निशाणा साधलाय. 'अर्थसंकल्पात सरकारची वचनबद्धता'
देशाच्या विकास आणि सुधारांच्या प्रती सरकारची असलेली वचनबद्धता या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसतेय. याद्वारे, करोना संक्रमणानंतरही आत्मनिर्भर भारत उभा राहू शकेल. येत्या दशकात भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्थांपैंकी एक असेल. नागरिकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प ठरेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. 'अर्थसंकल्पीय चर्चेत मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही आरोग्यासाठी एकूणच विचार करतो. प्रिव्हेन्टिव्ह हेल्थ, क्युरेटिव्ह हेल्थ आणि वेल-बिइंग यांचा समावेश आहे' असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी त्यांनी शेतकरी मुद्याद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसनं निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी मुद्यावर यू-टर्न घेतलाय. मध्यप्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की पंजाब सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल. तीन कायद्यांतील काही त्रुटी निदर्शनास आणून देतील. दाखवून देतील की हे कायदे नेमके कसे शेतकरीविरोधी आहेत, परंतु, असं काहीही घडलं नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसनं अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केलीय, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय.
'काँग्रेसमध्ये हम दो, हमारे दो'
राहुल गांधींच्या 'हम दो, हमारे दो' या संसदेतील वाक्यावरही अर्थमंत्र्यांनी पलटवार केला. 'हम दो, हमारे दो' तुमच्याकडेच आहे. दोन लोक पक्ष सांभाळणार आणि दोन लोक (मुलगी-जावाई) पक्षातील बाहेरचं सगळं... एका पक्षाच्या सरकारमध्ये 'जावयाला' अनेक राज्यांत (राजस्थान, हरयाणा) जमिनी मिळाल्या. मी याची अधिक माहिती तुम्हाला देऊ शकते... 'हम दो, हमारे दो' मध्ये जावयाची जमीन परत करण्याचीही घोषणा केली असती तर बरं झालं असतं, परंतु असं काहीही घडलेलं नाही... परंतु, आमचा पक्ष असं करत नाही. पंतप्रधान स्वनिधी योजना याचा ट्रेलर आहे. या योजनेद्वारे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची मदत करण्यात आली, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर नाव न घेता टीका केली.
'आमचे मित्र जावई नाहीत. असे लोक त्या पक्षाच्या मागे लपलेत ज्यांना जनतेनं अस्वीकार केलंय' असंही अर्थमंत्र्यांनी मोठ्या त्वेषानं म्हटलंय.
'अर्थसंकल्पावर चर्चा नाही?'
'शेतकरी मुद्यावर चर्चा करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही' या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. 'राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर चर्चेत सहभाग का घेतला नाही. मी अर्थसंकल्पावार चर्चा करणार नाही, असं म्हणणारे विरोधी पक्षाचे नेते काय रोल प्ले करू इच्छितात, असा प्रश्नही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात विचारला.
'राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान'
राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केलाय. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह... माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, असंही निर्मला सीतारमण यांनी संसदेत म्हटलं.
पहिल्या टप्प्यातील अधिवेशनाचा कामकाजाचा अखेरचा दिवस
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत (आज शेवटचा दिवस) सुरू राहणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा ८ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत सुरू राहील. राज्यसभेचं कामकाज शुक्रवारी संपुष्टात आलंय. त्यामुळे आज सकाळी १०.०० वाजल्यापासून लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झालीय.
देशाच्या विकास आणि सुधारांच्या प्रती सरकारची असलेली वचनबद्धता या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसतेय. याद्वारे, करोना संक्रमणानंतरही आत्मनिर्भर भारत उभा राहू शकेल. येत्या दशकात भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्थांपैंकी एक असेल. नागरिकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प ठरेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. 'अर्थसंकल्पीय चर्चेत मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही आरोग्यासाठी एकूणच विचार करतो. प्रिव्हेन्टिव्ह हेल्थ, क्युरेटिव्ह हेल्थ आणि वेल-बिइंग यांचा समावेश आहे' असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी त्यांनी शेतकरी मुद्याद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसनं निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी मुद्यावर यू-टर्न घेतलाय. मध्यप्रदेश आणि राजस्थानात त्यांच्या निवडणुकीतील घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की पंजाब सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल. तीन कायद्यांतील काही त्रुटी निदर्शनास आणून देतील. दाखवून देतील की हे कायदे नेमके कसे शेतकरीविरोधी आहेत, परंतु, असं काहीही घडलं नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना मुद्दा बनवणाऱ्या काँग्रेसनं अनेक राज्यांत शेतकऱ्यांची फसवणूक केलीय, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय.
'काँग्रेसमध्ये हम दो, हमारे दो'
राहुल गांधींच्या 'हम दो, हमारे दो' या संसदेतील वाक्यावरही अर्थमंत्र्यांनी पलटवार केला. 'हम दो, हमारे दो' तुमच्याकडेच आहे. दोन लोक पक्ष सांभाळणार आणि दोन लोक (मुलगी-जावाई) पक्षातील बाहेरचं सगळं... एका पक्षाच्या सरकारमध्ये 'जावयाला' अनेक राज्यांत (राजस्थान, हरयाणा) जमिनी मिळाल्या. मी याची अधिक माहिती तुम्हाला देऊ शकते... 'हम दो, हमारे दो' मध्ये जावयाची जमीन परत करण्याचीही घोषणा केली असती तर बरं झालं असतं, परंतु असं काहीही घडलेलं नाही... परंतु, आमचा पक्ष असं करत नाही. पंतप्रधान स्वनिधी योजना याचा ट्रेलर आहे. या योजनेद्वारे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची मदत करण्यात आली, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर नाव न घेता टीका केली.
'आमचे मित्र जावई नाहीत. असे लोक त्या पक्षाच्या मागे लपलेत ज्यांना जनतेनं अस्वीकार केलंय' असंही अर्थमंत्र्यांनी मोठ्या त्वेषानं म्हटलंय.
'अर्थसंकल्पावर चर्चा नाही?'
'शेतकरी मुद्यावर चर्चा करणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही' या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. 'राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर चर्चेत सहभाग का घेतला नाही. मी अर्थसंकल्पावार चर्चा करणार नाही, असं म्हणणारे विरोधी पक्षाचे नेते काय रोल प्ले करू इच्छितात, असा प्रश्नही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात विचारला.
'राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान'
राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केलाय. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह... माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, असंही निर्मला सीतारमण यांनी संसदेत म्हटलं.
पहिल्या टप्प्यातील अधिवेशनाचा कामकाजाचा अखेरचा दिवस
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत (आज शेवटचा दिवस) सुरू राहणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा ८ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत सुरू राहील. राज्यसभेचं कामकाज शुक्रवारी संपुष्टात आलंय. त्यामुळे आज सकाळी १०.०० वाजल्यापासून लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झालीय.