अ‍ॅपशहर

छत्तीसगड: सुरक्षा दलाच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2019, 12:00 pm
रायपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम naxal

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. यानंतर या परिसरातील जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन सैनिक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

शनिवारी सकाळी नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड भागातील जंगलांमध्ये ही चकमक झाली. यावेळी सैनिकांनी पाच नक्षलींना कंठस्नान घातले. गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

सुरक्षा दलाचे दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नक्षलवादी ठार झाल्याची सूचना मिळाल्यानंतर या भागात सैन्याने मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज