चेन्नईः तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम येथे आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झालेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीनंतर ज्वाळांचे प्रचंड लोट उठलेले पाहायला मिळाले. या घटनेचे काही दृश्यंही समोर आली आहेत. व्हिडिओमध्ये परिसर धुरानं भरलेला पाहायला मिळत आहे तर फटाक्यांचा आवाजही ऐकू येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशनमदलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.
मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली
दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमी झाले आहेत आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले.
या अगोदर जून महिन्यात एका अवैध फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक उद्या मुंबईत येणार
फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीनंतर ज्वाळांचे प्रचंड लोट उठलेले पाहायला मिळाले. या घटनेचे काही दृश्यंही समोर आली आहेत. व्हिडिओमध्ये परिसर धुरानं भरलेला पाहायला मिळत आहे तर फटाक्यांचा आवाजही ऐकू येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशनमदलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.
मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली
दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमी झाले आहेत आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले.
या अगोदर जून महिन्यात एका अवैध फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक उद्या मुंबईत येणार