आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
आसाम राज्य गंभीर पूरस्थितीचा सामना करीत असून मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराला बोलाविण्यात आले आहे; तसेच वायू दलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra Times 14 Aug 2017, 3:55 am
वृत्तसंस्था, गुवाहाटी
आसाम राज्य गंभीर पूरस्थितीचा सामना करीत असून मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराला बोलाविण्यात आले आहे; तसेच वायू दलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारपर्यंत पुराने १४ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील ३३ पैकी २१ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे.
आसामच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख राजीव प्रकाश बरुआ यांनी दिलेल्या महितीनुसार, पुराचा भीषण तडाखा बसलेल्या नगांव आणि कोक्राझाड जिल्ह्यात लष्कराला पाचारण केले आहे. हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना मोठ्या संख्येने मदतकार्यासाठी उतरविण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्याला दुसऱ्यांदा पुराचा तडाखा बसला आहे. पुराचा पहिला तडाखा एप्रिल-जुलै दरम्यान बसला होता. त्या पुरात ८५ लोकांचा बळी गेला होता. सुमारे १९ लाख लोकांना पुराचा फटका बसला होता.
आसाम राज्य गंभीर पूरस्थितीचा सामना करीत असून मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराला बोलाविण्यात आले आहे; तसेच वायू दलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारपर्यंत पुराने १४ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील ३३ पैकी २१ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे.
आसामच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख राजीव प्रकाश बरुआ यांनी दिलेल्या महितीनुसार, पुराचा भीषण तडाखा बसलेल्या नगांव आणि कोक्राझाड जिल्ह्यात लष्कराला पाचारण केले आहे. हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना मोठ्या संख्येने मदतकार्यासाठी उतरविण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्याला दुसऱ्यांदा पुराचा तडाखा बसला आहे. पुराचा पहिला तडाखा एप्रिल-जुलै दरम्यान बसला होता. त्या पुरात ८५ लोकांचा बळी गेला होता. सुमारे १९ लाख लोकांना पुराचा फटका बसला होता.