मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
देशाच्या पूर्वेपासून पश्चिम टोकापर्यंत आणि दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून अनेक राज्यांना पुरानं वेढा दिला आहे. आसाम, बिहार व कर्नाटकला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत ५०हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पावसामुळं झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळं राज्यांबरोबरच केंद्र सरकारलाही चिंतेत टाकलं आहे.
आसाममध्ये १९ लाख लोक कचाट्यात
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं २१ जिल्ह्यांमध्ये पूर आला असून राज्यातील सुमारे २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे जवान स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह आसाममधील पूरस्थितीची पाहणी केली व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बिहारमध्ये २६ ठार, यूपीत नद्या 'सैराट'
बिहार व उत्तर प्रदेशातही पावसानं जोर धरला असून शनिवारी बिहारमध्ये वीज पडून चार महिलांचा मृत्यू झाला. आजच्या दुर्घटनेमुळं बिहारमधील पाऊसबळींचा आकडा २६वर पोहोचला आहे. बिहारच्या १० जिल्ह्यातील सुमारे १७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत तुफान पाऊस सुरू असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दिल्लीची कोंडी
दिल्लीतही कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं असून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
राजस्थानातही मुसळधार
राजस्थानातही पावसानं अक्षरश: धुमशान घातलं आहे. येथील उदयपूर व अजमेरमध्ये तुफान पाऊस झाला. भिलवाडातील काही भागांत १५० मिमी तर प्रतापगडमधील अरनोदमध्ये १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बिकानेरमध्येही पावसानं चांगलाच जोर धरला आहे.
'आयटी सिटी' ठप्प
कर्नाटकची राजधानी व आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर पाऊस व पुरामुळं ठप्प झालं आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी झालं असून शाळा, महाविद्यालयं व कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील काही सखल भागांत इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत.
देशाच्या पूर्वेपासून पश्चिम टोकापर्यंत आणि दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून अनेक राज्यांना पुरानं वेढा दिला आहे. आसाम, बिहार व कर्नाटकला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत ५०हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पावसामुळं झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळं राज्यांबरोबरच केंद्र सरकारलाही चिंतेत टाकलं आहे.
आसाममध्ये १९ लाख लोक कचाट्यात
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं २१ जिल्ह्यांमध्ये पूर आला असून राज्यातील सुमारे २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे जवान स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह आसाममधील पूरस्थितीची पाहणी केली व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बिहारमध्ये २६ ठार, यूपीत नद्या 'सैराट'
बिहार व उत्तर प्रदेशातही पावसानं जोर धरला असून शनिवारी बिहारमध्ये वीज पडून चार महिलांचा मृत्यू झाला. आजच्या दुर्घटनेमुळं बिहारमधील पाऊसबळींचा आकडा २६वर पोहोचला आहे. बिहारच्या १० जिल्ह्यातील सुमारे १७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत तुफान पाऊस सुरू असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दिल्लीची कोंडी
दिल्लीतही कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं असून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
राजस्थानातही मुसळधार
राजस्थानातही पावसानं अक्षरश: धुमशान घातलं आहे. येथील उदयपूर व अजमेरमध्ये तुफान पाऊस झाला. भिलवाडातील काही भागांत १५० मिमी तर प्रतापगडमधील अरनोदमध्ये १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बिकानेरमध्येही पावसानं चांगलाच जोर धरला आहे.
'आयटी सिटी' ठप्प
कर्नाटकची राजधानी व आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर पाऊस व पुरामुळं ठप्प झालं आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी झालं असून शाळा, महाविद्यालयं व कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील काही सखल भागांत इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत.