आदिवासी भागात आणि वनक्षेत्रात राहणाऱ्यांचे वनोत्पादन गोळा करून त्यांची प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि विपणनाच्या उपक्रमांना ३ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या देशव्यापी लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे. आदिवासी भागात तसेच वन्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकडून लघुवन उत्पादन आणि गैरकाष्ठ वनोत्पादन गोळा करणे, कापणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याला लॉकडाउनमधून सवलत दिली आहे. त्याचबरोबर बांबू, नारळ, सुपारी, कोको, मसाल्यांची शेती, कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि विपणनालाही लॉकडाउनमधून वगळण्यात आले आहे. दरम्यान, आधारवर आधारित पेमेंट प्रणालीचा वापर करून दोन लाख पोस्टमन आमि ग्रामीण डाकसेवकांनी कुठल्याही बँकेशी संबंधित रक्कम इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या दारापर्यंत नेऊन देत आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
वनोत्पादनाला लॉकडाउनमधून वगळले
आदिवासी भागात आणि वनक्षेत्रात राहणाऱ्यांचे वनोत्पादन गोळा करून त्यांची प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री आणि विपणनाच्या उपक्रमांना ३ मेपर्यंत सुरू ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2020, 4:00 am