नवी दिल्ली
काँग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याची बैठक झाली होती, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप काँग्रेसने फेटाळून लावला असला तरी माजी लष्करप्रमुखाच्या एका वक्तव्याने काँग्रेस गोत्यात आली आहे. माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी अय्यर यांच्या घरी ही बैठक झाली होती असं सांगतानाच या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो, असा खुलासाही केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी हा खुलासा केला आहे. 'या बैठकीत फक्त भारत-पाक संबंधावर चर्चा झाली होती. बाकी कोणतीच चर्चा झाली नव्हती,' असंही कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. कपूर यांच्या या वक्तव्यामुळे अय्यर यांच्या घरी पाक नेत्याची बैठक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कपूर मार्च २०१० मध्ये निवृत्त झाले होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी हे भारत दौऱ्यावर आले असता अय्यर यांनी त्यांच्यासाठी 'डिनर मिटींग'चं आयोजन केलं होतं. या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, सलमान हैदर, टीसीए राघवन, शरत सभरवाल आणि के. शंकर वाजपेयी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर कसुरी यांनी 'भारत-पाक संबंध आणि सद्य:स्थिती' या विषयावरील परिसंवादातही भाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील एका सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. 'पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत अय्यर यांनी गुप्त बैठक का घेतली? त्यानंतर पाकिस्तानचे उच्चपदस्थ अधिकारी पटेलांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यासाठी विनंती का करत होते?,' असा सवाल मोदी यांनी केला होता. त्यावर मोदी हताश आणि निराश झाल्यानेच बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सांगत काँग्रेसने बैठक झाल्याचा इन्कार केला होता.
काँग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याची बैठक झाली होती, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप काँग्रेसने फेटाळून लावला असला तरी माजी लष्करप्रमुखाच्या एका वक्तव्याने काँग्रेस गोत्यात आली आहे. माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी अय्यर यांच्या घरी ही बैठक झाली होती असं सांगतानाच या बैठकीला आपण स्वत: उपस्थित होतो, असा खुलासाही केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी हा खुलासा केला आहे. 'या बैठकीत फक्त भारत-पाक संबंधावर चर्चा झाली होती. बाकी कोणतीच चर्चा झाली नव्हती,' असंही कपूर यांनी स्पष्ट केलं आहे. कपूर यांच्या या वक्तव्यामुळे अय्यर यांच्या घरी पाक नेत्याची बैठक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कपूर मार्च २०१० मध्ये निवृत्त झाले होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी हे भारत दौऱ्यावर आले असता अय्यर यांनी त्यांच्यासाठी 'डिनर मिटींग'चं आयोजन केलं होतं. या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, सलमान हैदर, टीसीए राघवन, शरत सभरवाल आणि के. शंकर वाजपेयी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर कसुरी यांनी 'भारत-पाक संबंध आणि सद्य:स्थिती' या विषयावरील परिसंवादातही भाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील एका सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. 'पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत अय्यर यांनी गुप्त बैठक का घेतली? त्यानंतर पाकिस्तानचे उच्चपदस्थ अधिकारी पटेलांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यासाठी विनंती का करत होते?,' असा सवाल मोदी यांनी केला होता. त्यावर मोदी हताश आणि निराश झाल्यानेच बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सांगत काँग्रेसने बैठक झाल्याचा इन्कार केला होता.