अ‍ॅपशहर

माजी सरन्यायाधीश कबीर यांचे निधन

माजी सरन्यायाधीश अल्तमश कबीर (६८) यांचे रविवारी दुपारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. आजारातील गुंतागुंत वाढत गेल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Maharashtra Times 20 Feb 2017, 2:47 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम former chief justice kabir passes away
माजी सरन्यायाधीश कबीर यांचे निधन
वृत्तसंस्था, कोलकाता

माजी सरन्यायाधीश अल्तमश कबीर (६८) यांचे रविवारी दुपारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. आजारातील गुंतागुंत वाढत गेल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. न्या. कबीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई लिऑन डिसूझा असा परिवार आहे. २९ सप्टेंबर २०१२ला त्यांची भारताचे ३९वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. १९ जुलै २०१३ला ते सेवानिवृत्त झाले. कबीर यांचा जन्म १९ जुलै १९४८ चा. १९७३ मध्ये ते वकील झाले आणि त्यांनी जिल्हा न्यायालय; तसेच कलकत्ता उच्च न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी खटले चालविण्यास सुरुवात केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज