नवी दिल्लीः संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्वीटला ऊर्दू शायरीचा आधार घेत प्रत्युत्तर दिले आहे. यावर राहुल गांधी यांनी पलटवार करत पुन्हा एकदा सवाल केला आहे. राहुल यांनी राजनाथ सिंग यांनाभारत-चीन सीमा वादावर प्रश्न केला आहे. संरक्षण मंत्र्यांचे हाताच्या प्रतीकावर भाष्य करून झाले असेल, तर ते चीनने लडाखमध्ये भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे का, याचे उत्तर देतील का?, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.
भारत आणि चीनने लष्कर आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेच्या माध्यमातून सीमा विवाद सोडविण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, प्रत्येकाला 'सीमे'चे वास्तव माहीत आहे पण, मन प्रसन्न ठेवण्यासाठी 'शाह-याद' ही कल्पना चांगली आहे. (सब को मालूम हैं सीमा की हकीकत लेकिन... दिल के खुश रखने को, 'शाह-यद' ये खयाल अच्छा है)
जागतिक स्तरावर भारताच्या संरक्षण धोरणाची स्वीकृती वाढली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी म्हटले होते. संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि इस्त्रायल नंतर आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असलेला एखादा देश असेल तर तो भारत आहे, असेही ते म्हणाले होतो. गृहमंत्र्यांच्या या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट केले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर आली. राजनाथ सिंग यांनी ट्वीट करत म्हटले, 'मिर्झा गालिब यांचाच शेर जरा वेगळ्या स्टाईलमध्ये आहे.' -
'हाथ में दर्द हो तो दवा कीजै
हाथ ही जब दर्द हो तो क्या कीजै'
अर्थात, जर हातामध्ये वेदना असेल तर त्यावर उपचार करू शकतोह, पण जर हातच वेदना बनला तर मग काय करावे?. या व्यतिरिक्त राजनाथ सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, 'मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की, जर हातात वेदना होत असेल तर औषधोपचार करा, जर हातच वेदना बनली असेल, तर मग काय करावे. बरेच काँग्रेस नेते प्रश्न विचारत आहेत की भारत-चीन सीमेवर काय चालले आहे?, संसदेत याचे उत्तर सविस्तरपणे दिेले जाईल असे मी देशातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो'.
भारत आणि चीनने लष्कर आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेच्या माध्यमातून सीमा विवाद सोडविण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, प्रत्येकाला 'सीमे'चे वास्तव माहीत आहे पण, मन प्रसन्न ठेवण्यासाठी 'शाह-याद' ही कल्पना चांगली आहे. (सब को मालूम हैं सीमा की हकीकत लेकिन... दिल के खुश रखने को, 'शाह-यद' ये खयाल अच्छा है)
जागतिक स्तरावर भारताच्या संरक्षण धोरणाची स्वीकृती वाढली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी म्हटले होते. संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि इस्त्रायल नंतर आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असलेला एखादा देश असेल तर तो भारत आहे, असेही ते म्हणाले होतो. गृहमंत्र्यांच्या या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट केले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर आली. राजनाथ सिंग यांनी ट्वीट करत म्हटले, 'मिर्झा गालिब यांचाच शेर जरा वेगळ्या स्टाईलमध्ये आहे.' -
'हाथ में दर्द हो तो दवा कीजै
हाथ ही जब दर्द हो तो क्या कीजै'
अर्थात, जर हातामध्ये वेदना असेल तर त्यावर उपचार करू शकतोह, पण जर हातच वेदना बनला तर मग काय करावे?. या व्यतिरिक्त राजनाथ सिंग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, 'मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की, जर हातात वेदना होत असेल तर औषधोपचार करा, जर हातच वेदना बनली असेल, तर मग काय करावे. बरेच काँग्रेस नेते प्रश्न विचारत आहेत की भारत-चीन सीमेवर काय चालले आहे?, संसदेत याचे उत्तर सविस्तरपणे दिेले जाईल असे मी देशातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो'.