मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
इशरत जहाँ चकमक प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला होता. इशरतचं लश्कर-ए-तोयबा कनेक्शन समोर येऊ नये, असं काही जणांना वाटत होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृह सचिव जी. के. पिल्लई यांनी केला आहे. पिल्लई यूपीए सरकारच्या कार्यकाळात गृह सचिव होते.
पिल्लई यांनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. इशरतबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आमच्या गुप्तचर यंत्रणांचं ते मोठं यश होतं, असे पिल्लई म्हणाले. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीमुळेच तेव्हा 'तोयबा'ने धाडलेल्या शूटर्सची माहिती मिळाली तसेच त्यांना शोधून काढता आलं, असं पिल्लई यांनी स्पष्ट केलं.
'ती' माहिती कोणी हटवली?
सरकारकडून कोर्टात दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये तफावत असल्याकडे लक्ष वेधले असता 'ही दोन्ही प्रतिज्ञापत्र वेगवेगळी आहेत. पहिल्या प्रतिज्ञापत्रात चकमकीत मारले गेलेले सर्वजण लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते, असे नमूद करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख हटवण्यात आला. हे का झालं मला माहित नाही. माझ्या पातळीवर हे काम झालेलं नव्हतं', असे पिल्लई यांनी सांगितले. हे बदल राजकीय स्तरावर करण्यात आले होते का?, असे थेट विचारले असता 'हो, राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतरच प्रतिज्ञापत्रात बदल करण्यात आले', असे त्यांनी स्पष्ट केले.
इशरतला सगळं माहित होतं...
इशरत जहाँ तोयबाची दहशतवादी होती का?, असा प्रश्न विचारला असता काहीतरी 'चुकीचं' घडणार आहे, याची कल्पना नक्कीच इशरतला होती, असा माझा कयास असल्याचे पिल्लई म्हणाले. इशरत अविवाहित असताना विवाहित व्यक्तीसोबत त्याची पत्नी म्हणून वावरत होती. या अँगलचा तपास सीबीआयने केलेलाच नाही, असे नमूद करत पिल्लई यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, आयबीचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनीही याप्रकरणात आधीच गंभीर आरोप केलेले आहेत. इशरतच्या तोयबा कनेक्शनचा उल्लेख काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून सीबीआयच्या आरोपपत्रातून हटवण्यात आला होता, असा आरोप राजेंद्र कुमार यांचा होता. सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी 'पोस्ट रिटायरमेंट प्लान'साठी या प्रकरणातलं सत्य लपवलं होतं, असेही राजेंद्र कुमार म्हणाले होते. आता पिल्लई यांच्या नव्या गौप्यस्फोटाने राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
सोनिया, राहुल उत्तर द्या: भाजप
पिल्लई यांनी उघड केलेल्या माहितीवर बोट ठेवत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने राजकीय सूड घेण्यासाठी हे सगळं केलं होतं हे आता सिद्ध झालं असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी देशाला उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
इशरत जहाँ चकमक प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला होता. इशरतचं लश्कर-ए-तोयबा कनेक्शन समोर येऊ नये, असं काही जणांना वाटत होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृह सचिव जी. के. पिल्लई यांनी केला आहे. पिल्लई यूपीए सरकारच्या कार्यकाळात गृह सचिव होते.
पिल्लई यांनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. इशरतबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आमच्या गुप्तचर यंत्रणांचं ते मोठं यश होतं, असे पिल्लई म्हणाले. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीमुळेच तेव्हा 'तोयबा'ने धाडलेल्या शूटर्सची माहिती मिळाली तसेच त्यांना शोधून काढता आलं, असं पिल्लई यांनी स्पष्ट केलं.
'ती' माहिती कोणी हटवली?
सरकारकडून कोर्टात दाखल करण्यात आलेल्या दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये तफावत असल्याकडे लक्ष वेधले असता 'ही दोन्ही प्रतिज्ञापत्र वेगवेगळी आहेत. पहिल्या प्रतिज्ञापत्रात चकमकीत मारले गेलेले सर्वजण लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते, असे नमूद करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख हटवण्यात आला. हे का झालं मला माहित नाही. माझ्या पातळीवर हे काम झालेलं नव्हतं', असे पिल्लई यांनी सांगितले. हे बदल राजकीय स्तरावर करण्यात आले होते का?, असे थेट विचारले असता 'हो, राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतरच प्रतिज्ञापत्रात बदल करण्यात आले', असे त्यांनी स्पष्ट केले.
इशरतला सगळं माहित होतं...
इशरत जहाँ तोयबाची दहशतवादी होती का?, असा प्रश्न विचारला असता काहीतरी 'चुकीचं' घडणार आहे, याची कल्पना नक्कीच इशरतला होती, असा माझा कयास असल्याचे पिल्लई म्हणाले. इशरत अविवाहित असताना विवाहित व्यक्तीसोबत त्याची पत्नी म्हणून वावरत होती. या अँगलचा तपास सीबीआयने केलेलाच नाही, असे नमूद करत पिल्लई यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, आयबीचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनीही याप्रकरणात आधीच गंभीर आरोप केलेले आहेत. इशरतच्या तोयबा कनेक्शनचा उल्लेख काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून सीबीआयच्या आरोपपत्रातून हटवण्यात आला होता, असा आरोप राजेंद्र कुमार यांचा होता. सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी 'पोस्ट रिटायरमेंट प्लान'साठी या प्रकरणातलं सत्य लपवलं होतं, असेही राजेंद्र कुमार म्हणाले होते. आता पिल्लई यांच्या नव्या गौप्यस्फोटाने राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
सोनिया, राहुल उत्तर द्या: भाजप
पिल्लई यांनी उघड केलेल्या माहितीवर बोट ठेवत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने राजकीय सूड घेण्यासाठी हे सगळं केलं होतं हे आता सिद्ध झालं असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी देशाला उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.