अ‍ॅपशहर

jk dutt ips : मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढले, पण करोनाशी हरले

मुंबईवर २००८ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एनएसजीने मोठी कामगिरी केली होती. अनेक ओलिसांची सुटका केली होती. यावेळी मोहीमेचं नेतृत्व जे. के. दत्त यांनी केलं होतं. जे. के. दत्त हे दहशतवाद्यांशी लढले पण करोनाविरोधातील लढाई मात्र हरले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2021, 8:46 am
नवी दिल्लीः नॅशनल सेक्युरिटी गार्डचे (NSG) माजी प्रमुख IPS अधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुरुग्राममध्ये निधन झाले. ते करोना पॉझिटिव्ह होते. मुंबईवर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व जे. के. दत्त यांनी केले होते. या ऑपरेशनला ब्लॅक टॉरनॅडो असे नाव देण्यात आले होते. दत्त हे ऑगस्ट २००६ ते २००९ पर्यंत NSG चे महासंचालक होते. NSG मध्ये दाखल होण्यापूर्वी ते CBI विशेष महासंचालक होते. बंगाल कॅडरमधून ते १९७१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते ७२ वर्षांचे होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jk dutt ips
मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढले, पण करोनाशी हरले


ओलिसांना सोडवण्याची जबाबदारी NSG वर होती

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये दहशवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याविरोधात NSG ने ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो राबवले होते. पाकिस्तानमधून आलेले सशस्त्र दहशतवाद्यांनी तास पॅलेस आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केलं होतं. १०० वर्ष जुन्या ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं. ओलिसांची सुटका करण्याची जबाबदारी NSG वर देण्यात आली होती.

क्रिकेट संघाच्या सुरक्षेसाठी विदेशात गेले होते NSG कमांडो

वेस्ट इंडिजमध्ये २००७ ला क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेसाठी NSG कमांडोना तैनात करण्यात आलं होतं. केंद्र सरकारने ही सुरक्षा पुरवली होती. त्यावेळी ज्योती कृष्ण दत्त हे NSG चे महासंचालक होते. पहिल्यांदाच विदेशात भारतीय क्रिकेट संघाला NSGची सुरक्षा देण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज