अ‍ॅपशहर

मॉब लिंचिंग समाजासाठी घातक: मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढती असहिष्णुता आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला. समाजातील वाढती असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळं समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे, असं सिंग म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 1:50 pm
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढती असहिष्णुता आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला. समाजातील वाढती असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळं समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे, असं सिंग म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ७५व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम PM-Manmohan-singh


आपल्याला राजीव गांधी यांच्या मार्गानं चालायला हवं. ते शांती, ऐक्य आणि धार्मिक सलोखा वाढावा यासाठी सतत प्रोत्साहन देत होते, असंही सिंग म्हणाले. देशातील काही प्रवृत्तींमुळं असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. द्वेष पसरवणाऱ्या काही संघटना हे काम करत आहेत. जमाव कायदा हातात घेत आहे. त्यामुळं आपल्या समजाचं नुकसान होत आहे, असंही ते म्हणाले.

भारत अविभाज्य आहे आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रवादाचा आधार आहे. कोणताच धर्म द्वेष आणि असहिष्णुतेची शिकवण देत नाही. बाहेरील आणि अंतर्गत काही असंतुष्ट शक्ती स्वार्थापोटी भारताचे विभाजन करण्यासाठी धार्मिक कट्टरता आणि हिंसा भडकवण्याचे काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज