नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. हेडलाइन मॅनेजमेंटमधून बाहेर पडा, अर्थव्यवस्था आणखी ढासळलीय. त्याकडे लक्ष द्या, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारला दिला आहे. आपली अर्थव्यवस्था ढासळत चालली असून सरकारला त्याची जाणीव नाही. सध्या आपण आर्थिक मंदीचा सामना करत आहोत, अशी टीकाही त्यांनी केली.
देशाचा विकासदर केवळ ५ टक्के राहिला आहे. २००८मध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी अर्थव्यवस्था एकदमच ढासळली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटामुळे अर्थव्यवस्था ढासळली होती. त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्याचं आमच्यासमोर आव्हान होतं. मात्र या आव्हानाकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि अर्थव्यवस्था मजबूत केली, असं मनमोहन सिंग म्हणाले.
आजही आपण अशाच परिस्थितीचा सामना करत आहोत. रियल इस्टेट असो की कृषी क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात पिछेहाट होत असल्याने अर्थव्यवस्था ढासळली आहे. या भयंकर परिस्थितीतून लवकर बाहेर पडलो नाही तर रोजगाराच्या क्षेत्रात मोठं संकट निर्माण होईल. लोक सातत्याने बेरोजगार झाल्यास अर्थव्यवस्थेसमोर आणखी संकट निर्माण होईल, असंही त्यांनी सांगितलं.
देशाचा विकासदर केवळ ५ टक्के राहिला आहे. २००८मध्येही अशीच परिस्थिती होती. त्यावेळी अर्थव्यवस्था एकदमच ढासळली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटामुळे अर्थव्यवस्था ढासळली होती. त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्याचं आमच्यासमोर आव्हान होतं. मात्र या आव्हानाकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि अर्थव्यवस्था मजबूत केली, असं मनमोहन सिंग म्हणाले.
आजही आपण अशाच परिस्थितीचा सामना करत आहोत. रियल इस्टेट असो की कृषी क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात पिछेहाट होत असल्याने अर्थव्यवस्था ढासळली आहे. या भयंकर परिस्थितीतून लवकर बाहेर पडलो नाही तर रोजगाराच्या क्षेत्रात मोठं संकट निर्माण होईल. लोक सातत्याने बेरोजगार झाल्यास अर्थव्यवस्थेसमोर आणखी संकट निर्माण होईल, असंही त्यांनी सांगितलं.