तिरूपती : आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीतून हलविण्यात येणार असून, विझियानगरम, काकीनाडा, गुंटूर आणि कडप्पा अशा चार राजधानी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मांडल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार टी.जी. वेंकटेश यांनी केला आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय स्तरावर चर्चा केल्याचाही दावा त्यांनी केला. यानंतर राज्यात वादाला तोंड फुटले आहे. तत्कालीन तेलगू देसम सरकारने राज्याची राजधानी अमरावतीला करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थानिक आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणूनच तेलगू देसमचा निवडणुकीत पराभव झाला, असेही वेंकटेश म्हणाले. मात्र, ही माहिती देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव त्यांनी सांगितले नाही.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय स्तरावर चर्चा केल्याचाही दावा त्यांनी केला. यानंतर राज्यात वादाला तोंड फुटले आहे. तत्कालीन तेलगू देसम सरकारने राज्याची राजधानी अमरावतीला करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थानिक आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणूनच तेलगू देसमचा निवडणुकीत पराभव झाला, असेही वेंकटेश म्हणाले. मात्र, ही माहिती देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव त्यांनी सांगितले नाही.