नवी दिल्ली: भारतातील करोनाची तिसरी लाट कधी ओसरणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. देशातील प्रमुख महानगरांना सुटकेचा निश्वास टाकता येईल अशीच ही बातमी आहे. ( Covid Third Wave In India Latest Breaking News ) वाचा : आपल्याला आता करोनासोबतच जगावे लागेल का? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत...
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट धडकली. या लाटेत सर्वात आधी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू या महानगरांना फटका बसला. या सर्वच शहरांत रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही स्थिती आता नियंत्रणात येत असतानाच अनुराग अग्रवाल यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. देशातील प्रमुख महानगरांमधील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी करोनाचा धोका कमी झाला असल्याची दिलासा देणारी बातमीही दिली.
वाचा : मोठी बातमी : केंद्राचे राज्यांना पत्र; म्हटले, करोना संसर्गात लागू निर्बंध...
करोना विषाणूचे उत्परिवर्तन (म्युटेशन) तूर्त दिसत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होणार असे म्हणण्याला सध्यातरी कोणताही आधार दिसत नाही. देशात कोविड स्थिती नियंत्रणात आहे आणि त्यात मोठा काही बदल होईल अशी कोणतीही शक्यता नाही. तरीही आपल्याला येणाऱ्या काळात सतर्क राहावं लागणार आहे. करोना विषाणू अजून गेलेला नाही. तो येथेच आहे. म्युटेशन हा त्याचा स्थायी भाव आहे. ही बाब लक्षात घेऊन आपणही कोविड अनुरूप वर्तन कायम राखलं पाहिजे. विशेषत: कोंदट हवामान असेल तिथे अधिक दक्षता बाळगली गेली पाहिजे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले. कोविडची गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता फारच कमी असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. भारतात १० जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनची व्याप्ती ९० टक्क्यांच्या वर गेली होती. त्या स्थितीत वेगाने सुधारणा झाली. डेल्टा व्हेरिएंटचा विचार केल्यास त्याचे प्रमाण आता फारच कमी झाले आहे. ही एकंदर स्थिती लक्षात घेता सहव्याधीग्रस्त वा ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना बूस्टर डोसची आता तितकीशी गरज नाही, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.
वाचा : ...तर दीप सिद्धूचे प्राण वाचले असते!; अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट धडकली. या लाटेत सर्वात आधी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू या महानगरांना फटका बसला. या सर्वच शहरांत रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही स्थिती आता नियंत्रणात येत असतानाच अनुराग अग्रवाल यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. देशातील प्रमुख महानगरांमधील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी करोनाचा धोका कमी झाला असल्याची दिलासा देणारी बातमीही दिली.
वाचा : मोठी बातमी : केंद्राचे राज्यांना पत्र; म्हटले, करोना संसर्गात लागू निर्बंध...
करोना विषाणूचे उत्परिवर्तन (म्युटेशन) तूर्त दिसत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होणार असे म्हणण्याला सध्यातरी कोणताही आधार दिसत नाही. देशात कोविड स्थिती नियंत्रणात आहे आणि त्यात मोठा काही बदल होईल अशी कोणतीही शक्यता नाही. तरीही आपल्याला येणाऱ्या काळात सतर्क राहावं लागणार आहे. करोना विषाणू अजून गेलेला नाही. तो येथेच आहे. म्युटेशन हा त्याचा स्थायी भाव आहे. ही बाब लक्षात घेऊन आपणही कोविड अनुरूप वर्तन कायम राखलं पाहिजे. विशेषत: कोंदट हवामान असेल तिथे अधिक दक्षता बाळगली गेली पाहिजे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले. कोविडची गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता फारच कमी असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. भारतात १० जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनची व्याप्ती ९० टक्क्यांच्या वर गेली होती. त्या स्थितीत वेगाने सुधारणा झाली. डेल्टा व्हेरिएंटचा विचार केल्यास त्याचे प्रमाण आता फारच कमी झाले आहे. ही एकंदर स्थिती लक्षात घेता सहव्याधीग्रस्त वा ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना बूस्टर डोसची आता तितकीशी गरज नाही, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.
वाचा : ...तर दीप सिद्धूचे प्राण वाचले असते!; अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर