अ‍ॅपशहर

आझादांचे 'ते' वक्तव्य कामकाजातून वगळले

राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केलेले वादग्रस्त विधान कामकाजातून वगळण्यात आले आहे. आझाद यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यूंची तुलना आझाद यांनी उरी हल्ल्याशी केल्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी सरकार आणि भाजपनं केली होती. तथापि, आझाद मुळीच माफी मागणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.

Maharashtra Times 17 Nov 2016, 11:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ghulam nabi azads remark during demonetisation debate in rajya sabha expunged
आझादांचे 'ते' वक्तव्य कामकाजातून वगळले


राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केलेले वादग्रस्त विधान कामकाजातून वगळण्यात आले आहे. आझाद यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यूंची तुलना आझाद यांनी उरी हल्ल्याशी केल्याबाबत त्यांनी माफी मागावी अशी मागणी सरकार आणि भाजपनं केली होती. तथापि, आझाद मुळीच माफी मागणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.

आझाद यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी सभागृहात मोठा गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज शुक्रवार पर्यंत तहकूब करण्यात आले. नोटाबंदीनंतर बँकांसमोरील रांगांमध्ये उभे राहून झालेल्या मृत्यूंची तुलना उरी दहशतवादी हल्ल्याशी केली होती. भाजप आणि सरकारने केलेल्या तीव्र विरोधानंतर आझाद यांचे हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात आले.

संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हे विवादास्पद वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी करत म्हटले, 'याची तुलना पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याशी करून विरोधी पक्षाचे नेते देशाचा अपमान करत आहेत.'

गुलाम नबी आझाद एक जबाबदार नेते आहेत, त्यांनी मोठी चूक केली आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी नायडू यांनी केली.

तर गुलाम नबी आझाद म्हणाले, ' तुम्ही पाकिस्तानात जाऊन लग्न समारंभ, तसेच इतर समारोहांमध्ये सहभागी होता आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरता, आणि तुम्ही आम्हाला हे सांगता.' यानंतर गोंधळ वाढत गेला आणि सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

आझाद यांनी माफी मागावी ही भाजपची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, ' आझाद यांनी का माफी मागावी, त्यांनी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज