वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'आर्थिकदृष्ट्या संकटात सापडल्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. या शेतकऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. साखरेला सध्याच्या २९ रुपये किलोवरून ३४ रुपये किलो इतकी किमान आधारभूत किंमत द्यावी,' अशी मागणीही पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
लहान आणि अल्प उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि नैराश्य पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देताना पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
'आर्थिकदृष्ट्या संकटात सापडल्यामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. या शेतकऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. साखरेला सध्याच्या २९ रुपये किलोवरून ३४ रुपये किलो इतकी किमान आधारभूत किंमत द्यावी,' अशी मागणीही पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
लहान आणि अल्प उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि नैराश्य पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देताना पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.