अ‍ॅपशहर

हमीद अन्सारींवर संघाची जोरदार टीका

देशातील मुस्लिमांमध्ये भीतीची भावना असल्याचं वक्तव्य करणारे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं टीकेची तोफ डागली आहे. 'अन्सारी जे काही बोलले, ते भारतातल्या मुस्लिमांनाही पटलेलं नाही. त्यामुळं अन्सारींना जिथं सुरक्षित वाटतं, त्या देशात जाण्यासाठी ते मोकळे आहेत,' अशा शब्दांत संघाचे नेते व राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे निमंत्रक इंद्रेश कुमार यांनी अन्सारींना सुनावलं आहे.

Maharashtra Times 13 Aug 2017, 10:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम go where you feel secure rsss indresh kumar tells hamid ansari
हमीद अन्सारींवर संघाची जोरदार टीका


देशातील मुस्लिमांमध्ये भीतीची भावना असल्याचं वक्तव्य करणारे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं टीकेची तोफ डागली आहे. 'अन्सारी जे काही बोलले, ते भारतातल्या मुस्लिमांनाही पटलेलं नाही. त्यामुळं अन्सारींना जिथं सुरक्षित वाटतं, त्या देशात जाण्यासाठी ते मोकळे आहेत,' अशा शब्दांत संघाचे नेते व राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे निमंत्रक इंद्रेश कुमार यांनी अन्सारींना सुनावलं आहे.

राष्ट्रीय मुस्लिम मंचानं आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात देशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळं देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून इंद्रेश कुमार यांनी अन्सारींचा खरपूस समाचार घेतला. 'अन्सारींचं वक्तव्य कुणीही मनावर घेतलं नाही, हे त्यांचं दुर्दैव. खुद्द मुस्लिमांनीच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. सत्तेच्या खुर्चीत असताना दहा वर्षे ते धर्मनिरपेक्ष होते. आता कार्यकाळ संपताच त्यांच्यातला कट्टरपंथी मुस्लिम जागा झालाय. आतापर्यंत ते भारतीय होते. आता सांप्रदायिक झालेत. आतापर्यंत ते सर्व पक्षांचे नेते होते. आता अचानक ते काँग्रेसवाले झालेत. गेल्या दहा वर्षांत त्यांना असुरक्षित वाटलं नाही. आता अचानक असं का वाटू लागलं,' असा सवाल इंद्रेश कुमार यांनी केला.

'अन्सारी यांनी भारतात राहून त्रास सहन करावा, असं आम्हालाही वाटत नाही. जगातील कोणत्या देशात मुस्लिम सुरक्षित आहेत ते त्यांनी सांगावं आणि तिकडं जावं,' असंही इंद्रेश कुमार यांनी सुनावलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज