अ‍ॅपशहर

गोव्यातील सरकार अल्पजीवी ठरेलः संजय राऊत

गोव्यातील सरकार हे भ्रष्ट आघाडीचं सरकार असून ते अल्पजीवी ठरेल, असं टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सोडलं आहे. गोव्यातील जनतेनं भाजपला स्पष्टपणे नाकारलं होतं. त्यानंतर भ्रष्ट आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. हे सरकार हंगामीच ठरेल, असं 'रोखठोक' मत त्यांनी माडलं.

Maharashtra Times 20 Mar 2017, 4:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पणजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goa has a temporary govt its a corrupt alliance says sanjay raut
गोव्यातील सरकार अल्पजीवी ठरेलः संजय राऊत


गोव्यातील सरकार हे भ्रष्ट आघाडीचं सरकार असून ते अल्पजीवी ठरेल, असं टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सोडलं आहे.

गोव्यातील जनतेनं भाजपला स्पष्टपणे नाकारलं होतं. त्यानंतर भ्रष्ट आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. हे सरकार हंगामीच ठरेल, असं 'रोखठोक' मत त्यांनी माडलं.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचे फक्त १३ आमदार निवडून आले होते. याउलट काँग्रेसनं १७ जागा जिंकल्या होत्या. परंतु, भाजपनं चाणक्यनीतीनं आठ आमदारांचा पाठिंबा मिळवला आणि सरकार स्थापन केलं. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली आणि नंतर विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं. त्यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाला आहेच, पण भाजपच्या या 'चमत्कारा'मुळे शिवसेनेचाही पापड मोडला आहे. गोवा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी केली होती. परंतु, या शिवसेनेचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. त्यामुळे, गोव्यात भाजपनं सत्तेचं गणित जमवल्यापासूनच शिवसेना त्यांच्यावर सातत्याने टीकेचे बाण सोडत आहे.

Goa has a temporary Govt.Its a corrupt alliance.The BJP here had been completely rejected by people during polls: Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/LdF9pl9FZp — ANI (@ANI_news) March 20, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज