वृत्तसंस्था, सोनभद्र (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. सुमारे तीन हजार ३५० टन सोने येथे दडले असल्याची माहिती भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभाग (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूविज्ञान व खाण संचालनालयाने दिली आहे. सध्याच्या ६२६ टन सोन्याच्या साठ्यापेक्षा हा साठा पाच पट अधिक असून, लवकरच यासाठीची खोदाई करण्यात येणार आहे.
सोनापहाडी व हरदी भागात सोन्याचे साठे आढळून आले आहेत. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनापहाडीमध्ये २७०० लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये ६५० लाख टन सोने सापडले आहे. ई-लिलावाद्वारे या साठ्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, यासाठी प्रशासनाने ७ सदस्यांची एक टीम स्थापन केली असल्याची माहिती सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी दिली.
'जीएसआयचे पथक सोन्याच्या खाणीच्या क्षेत्राचा नकाशा तयार करून त्याचे भौगोलिक टॅगिंग करणार आहेत. बहुतेक खाणी टेकडीवर असल्यामुळे त्याचे खणणे सुलभ होणार आहे. नुकसान भरपाई आणि आवश्यक मंजुरी मिळाल्याबरोबर सरकार लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे, हे पथक २२ फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल खाण संचालकांकडे सादर करणार आहेत. यानंतरच राज्य सरकार ऑनलाइन पद्धतीने लिलावासाठी निविदा काढण्याच्या सूचना देणार आहे, असेही खाण अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागास भागांचा विकास होणार
जिल्ह्यात युरेनियमचादेखील साठा असल्याचा अंदाज आहे. तसेच, यूपीमधील बुंदेलखंड आणि विंध्यान जिल्ह्यात सोने, हिरे, प्लॅटिनम, चुनखडी, ग्रॅनाइट, फॉस्फेट आणि चिनी माती या खनिजांची समृद्धी आहे.
सोन्याच्या खाणी आणि इतर खनिजांच्या शोधामुळे राज्याच्या महसुलाला मोठा चालना मिळणार आहे. कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्यादेखील या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील या दोन मागास प्रदेशांचा विकास होणार आहे.
उत्तर प्रदेशातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. सुमारे तीन हजार ३५० टन सोने येथे दडले असल्याची माहिती भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभाग (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूविज्ञान व खाण संचालनालयाने दिली आहे. सध्याच्या ६२६ टन सोन्याच्या साठ्यापेक्षा हा साठा पाच पट अधिक असून, लवकरच यासाठीची खोदाई करण्यात येणार आहे.
सोनापहाडी व हरदी भागात सोन्याचे साठे आढळून आले आहेत. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनापहाडीमध्ये २७०० लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये ६५० लाख टन सोने सापडले आहे. ई-लिलावाद्वारे या साठ्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, यासाठी प्रशासनाने ७ सदस्यांची एक टीम स्थापन केली असल्याची माहिती सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी दिली.
'जीएसआयचे पथक सोन्याच्या खाणीच्या क्षेत्राचा नकाशा तयार करून त्याचे भौगोलिक टॅगिंग करणार आहेत. बहुतेक खाणी टेकडीवर असल्यामुळे त्याचे खणणे सुलभ होणार आहे. नुकसान भरपाई आणि आवश्यक मंजुरी मिळाल्याबरोबर सरकार लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे, हे पथक २२ फेब्रुवारीपर्यंत आपला अहवाल खाण संचालकांकडे सादर करणार आहेत. यानंतरच राज्य सरकार ऑनलाइन पद्धतीने लिलावासाठी निविदा काढण्याच्या सूचना देणार आहे, असेही खाण अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागास भागांचा विकास होणार
जिल्ह्यात युरेनियमचादेखील साठा असल्याचा अंदाज आहे. तसेच, यूपीमधील बुंदेलखंड आणि विंध्यान जिल्ह्यात सोने, हिरे, प्लॅटिनम, चुनखडी, ग्रॅनाइट, फॉस्फेट आणि चिनी माती या खनिजांची समृद्धी आहे.
सोन्याच्या खाणी आणि इतर खनिजांच्या शोधामुळे राज्याच्या महसुलाला मोठा चालना मिळणार आहे. कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्यादेखील या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील या दोन मागास प्रदेशांचा विकास होणार आहे.