अ‍ॅपशहर

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशा सरकारच्या पुस्तिकेत उल्लेख

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मृत्यू हा 'अपघाती' होता, असा उल्लेख ओडिशा सरकारच्या पुस्तिकेत केल्याचं समोर आल्यानं राज्यात वाद उफाळून आला आहे. या मुद्द्यावरून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी आणि तात्काळ ही चूक दुरूस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2019, 3:35 pm
भुवनेश्वर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मृत्यू हा 'अपघाती' होता, असा उल्लेख ओडिशा सरकारच्या पुस्तिकेत केल्याचं समोर आल्यानं राज्यात वाद उफाळून आला आहे. या मुद्द्यावरून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी आणि तात्काळ ही चूक दुरूस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahatma-gandhi


महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ओडिशा सरकारच्या शिक्षण विभागानं नुकतीच एक दोन पानी पुस्तिका प्रकाशित केली. गांधींच्या स्मरणार्थ 'Aama Bapuji: Eka Jhalaka' या नावानं ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेली शिकवण, त्यांचं महान कार्य आणि ओडिशा राज्याशी त्यांचे असलेले नाते याबाबत उल्लेख केला आहे. मात्र, या पुस्तिकेत त्यांच्या मृत्यूबाबत केलेल्या उल्लेखानं वादंग निर्माण झाले. 'नवी दिल्ली येथील बिर्ला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचा अपघाती कारणांमुळं मृत्यू झाला,' असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

महात्मा गांधी, मंडेलांच्या प्रतिमांचे अनावरण

पुस्तिकेत काय?

ओडिशाच्या शालेय शिक्षण विभागाने महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ दोन पानी पुस्तिका प्रकाशित केली आहे. 'आमचे बापुजी: एक झलक' नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तिकेचे वाटप राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात आले होते. त्यात महात्मा गांधी यांची अनेक छायाचित्रेही आहेत. '३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये काही आकस्मिक घटनांमुळं गांधीजींचा मृत्यू झाला होता,' असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. युवा पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे. त्यासाठी इतिहास तोडून-मोडून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

'ही अक्षम्य अशी चूक आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नरसिंह मिश्रा यांनी केली आहे. या घोडचुकीची जबाबदारी पटनायक यांनी घेऊन माफी मागावी आणि ही पुस्तिका तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी केली आहे. या प्रकरणावरून वाद उफाळल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री समीर दास यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील असे सांगितले. मात्र, पुस्तिकेत जाणूनबुजून कोणताही उल्लेख करण्यात आला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. सरकारने ही बाब गांभीर्यानं घेतली आहे. याला जबाबदार कोण आहे हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,' असं दास यांनी सांगितलं.

वंशवादाचा आरोप; गांधी पुतळ्याला ब्रिटनमध्ये विरोध

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज