नवी दिल्ली:
आयात केलेल्या कांद्यासंदर्भातली किटकनाशक फवारणीसंदर्भातले नियम शिथील करण्याची मुदत कृषी मंत्रालयाने ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशी बाजारात कांद्याची आवक लवकरात लवकर वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
६ नोव्हेंबर रोजी कृषी मंत्रालयाने प्लांट क्वारंटाइन (पीक्यू) ऑर्डर २००३ अंतर्गत, किटकनाशक फवारणी नियम ३० नोव्हेंबरपर्यंत शिथील करण्यात आला, जेणेकरून अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्थान आणि इराणमधून कांदा आयात करता येईल आणि किमतीवर नियंत्रण राहिल. आता आपल्या ताज्या आदेशात मंत्रालयाने काही अटींसह ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यात म्हटलंय की ज्या व्यापाऱ्यांनी किटकनाशक फवारणीशिवायचा कांदा आयात केला आहे, किंवा पीएससीवर या प्रकारचे उपचार करणार असे सांगितले आहे अशा व्यापाऱ्यांना भारतात फवारणीची परवानगी देता येईल. अशा प्रकारचा आयात कांदा वेगळा ठेवला जावा आणि अधिकारी त्याची तपासणी करतील, असंही आदेशात म्हटले आहे. या तपासणीत भारतासाठी धोकादायक किटक किंवा रोगमुक्त असा हा कांदा असेल तेव्हाच तो पुढे विक्रीसाठी पाठवला जाईल.
एमएमटीसीच्या माध्यामातून सुमारे १ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सध्या तरी कांद्याचे भाव चढेच आहेत.
आयात केलेल्या कांद्यासंदर्भातली किटकनाशक फवारणीसंदर्भातले नियम शिथील करण्याची मुदत कृषी मंत्रालयाने ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशी बाजारात कांद्याची आवक लवकरात लवकर वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
६ नोव्हेंबर रोजी कृषी मंत्रालयाने प्लांट क्वारंटाइन (पीक्यू) ऑर्डर २००३ अंतर्गत, किटकनाशक फवारणी नियम ३० नोव्हेंबरपर्यंत शिथील करण्यात आला, जेणेकरून अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्थान आणि इराणमधून कांदा आयात करता येईल आणि किमतीवर नियंत्रण राहिल. आता आपल्या ताज्या आदेशात मंत्रालयाने काही अटींसह ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यात म्हटलंय की ज्या व्यापाऱ्यांनी किटकनाशक फवारणीशिवायचा कांदा आयात केला आहे, किंवा पीएससीवर या प्रकारचे उपचार करणार असे सांगितले आहे अशा व्यापाऱ्यांना भारतात फवारणीची परवानगी देता येईल. अशा प्रकारचा आयात कांदा वेगळा ठेवला जावा आणि अधिकारी त्याची तपासणी करतील, असंही आदेशात म्हटले आहे. या तपासणीत भारतासाठी धोकादायक किटक किंवा रोगमुक्त असा हा कांदा असेल तेव्हाच तो पुढे विक्रीसाठी पाठवला जाईल.
एमएमटीसीच्या माध्यामातून सुमारे १ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सध्या तरी कांद्याचे भाव चढेच आहेत.