मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद
नोटाबंदीच्या निर्णयाआडून मुस्लिम समाजाला त्रास दिला जात आहे. एक-एक पैशासाठी त्यांना झगडावं लागत आहे. मुस्लिम बहुल भागातील एटीएममध्ये सध्या खडखडाट आहे. या भागांतील बँकाही बंद आहेत. हे सगळं जाणूनबुजून केलं जात आहे, असा गंभीर आरोप आज एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
हैदराबादमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित सभेत बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी हुकूमशहा आहेत. त्यांनी अहंकारापोटी देशावर नोटाबंदीचं संकट लादलंय. अशाने अर्थक्रांतीचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, अशी तोफच ओवेसी यांनी डागली.
नोटाबंदीमुळे लोकांचे जे हाल सुरू आहेत त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागणार आहेत. जे लोक बँक आणि एटीएमच्या रांगेत उभे आहेत तेच लोक उद्या मतदानाच्या रांगेत उभे असणार आहेत हे ध्यानात ठेवावे, असा इशाराही ओवेसी यांनी दिला. अनेक पंतप्रधान आले आणि गेले. त्याप्रमाणे तुम्हालाही एक दिवस सत्तेतून जावं लागणार आहे, असा टोलाही ओवेसी यांनी मोदींना लगावला.
मोदी स्वत:ला फकीर म्हणाले होते. त्या विधानाचाही ओवेसी यांनी समाचार घेतला. १५ लाखांचा सूट वापरणारी व्यक्ती फकीर असते का? रोज नव्या स्टाइलचे कपडे घालणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा फकीर म्हणायचे?, असे प्रश्नही ओवेसी यांनी विचारले. नोटाबंदीमुळे १२० लोकांचा बळी गेला. त्यामुळे तुम्ही फकीर नव्हे, क्रूर आहात, अशी टीका ओवेसी यांनी केली.
जातीय रंग देण्यासाठीच हे वक्तव्य: भाजप
केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ओवेसी यांचे आरोप फेटाळत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळं धन आणि भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलं असताना त्याचं आधी राजकारण करण्यात आलं आणि आता या निर्णयाला जातीय रंग दिला जात आहे, अशी तोफ नक्वी यांनी डागली. ज्या भागातील एटीएममध्ये कॅश नाही अशा भागांची माहिती ओवेसी यांनी द्यावी, असे आवाहनही नक्वी यांनी केले. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपण अधिकाऱ्यांसोबत अल्पसंख्याक बहुल भागात जाणार आहे. तेथे कॅशलेस आर्थिक व्यवहारांबाबत जनजागृती करण्यासाठी कॅम्प आयोजित केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 'एटीएम धर्म पाहत नाही. त्यामुळे ओवेसी यांनी हा मुद्दा धर्माशी जोडू नये', असा सणसणीत टोला केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लगावला.
नोटाबंदीच्या निर्णयाआडून मुस्लिम समाजाला त्रास दिला जात आहे. एक-एक पैशासाठी त्यांना झगडावं लागत आहे. मुस्लिम बहुल भागातील एटीएममध्ये सध्या खडखडाट आहे. या भागांतील बँकाही बंद आहेत. हे सगळं जाणूनबुजून केलं जात आहे, असा गंभीर आरोप आज एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
हैदराबादमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित सभेत बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी हुकूमशहा आहेत. त्यांनी अहंकारापोटी देशावर नोटाबंदीचं संकट लादलंय. अशाने अर्थक्रांतीचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, अशी तोफच ओवेसी यांनी डागली.
नोटाबंदीमुळे लोकांचे जे हाल सुरू आहेत त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागणार आहेत. जे लोक बँक आणि एटीएमच्या रांगेत उभे आहेत तेच लोक उद्या मतदानाच्या रांगेत उभे असणार आहेत हे ध्यानात ठेवावे, असा इशाराही ओवेसी यांनी दिला. अनेक पंतप्रधान आले आणि गेले. त्याप्रमाणे तुम्हालाही एक दिवस सत्तेतून जावं लागणार आहे, असा टोलाही ओवेसी यांनी मोदींना लगावला.
मोदी स्वत:ला फकीर म्हणाले होते. त्या विधानाचाही ओवेसी यांनी समाचार घेतला. १५ लाखांचा सूट वापरणारी व्यक्ती फकीर असते का? रोज नव्या स्टाइलचे कपडे घालणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा फकीर म्हणायचे?, असे प्रश्नही ओवेसी यांनी विचारले. नोटाबंदीमुळे १२० लोकांचा बळी गेला. त्यामुळे तुम्ही फकीर नव्हे, क्रूर आहात, अशी टीका ओवेसी यांनी केली.
जातीय रंग देण्यासाठीच हे वक्तव्य: भाजप
केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ओवेसी यांचे आरोप फेटाळत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळं धन आणि भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलं असताना त्याचं आधी राजकारण करण्यात आलं आणि आता या निर्णयाला जातीय रंग दिला जात आहे, अशी तोफ नक्वी यांनी डागली. ज्या भागातील एटीएममध्ये कॅश नाही अशा भागांची माहिती ओवेसी यांनी द्यावी, असे आवाहनही नक्वी यांनी केले. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपण अधिकाऱ्यांसोबत अल्पसंख्याक बहुल भागात जाणार आहे. तेथे कॅशलेस आर्थिक व्यवहारांबाबत जनजागृती करण्यासाठी कॅम्प आयोजित केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 'एटीएम धर्म पाहत नाही. त्यामुळे ओवेसी यांनी हा मुद्दा धर्माशी जोडू नये', असा सणसणीत टोला केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लगावला.